राजीनाम्याच्या चर्चेने अस्वस्थ दिलीप तिवारी यांनी सोडली पातळी!


'देशदूत'चे जळगावमधील सहाय्यक संपादक दिलीप तिवारी यांनी पदाच्या राजीनाम्याची एक महिन्याची नोटीस दिल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे व्यवस्थापनाने त्यांच्यासह आणखी एकाचा राजीनामा घेतल्याची चर्चा पत्रकारांमध्ये दबक्या आवाजात सुरु झाली. अर्थातच दोन-चार दिवसांपूर्वी नाशिकहून मालक विक्रमभाऊ सारडा व प्रशासनाच्या कुलकर्णी बाई आल्या होत्या, त्यावेळी जे काही असेल ते नाट्य घडले. ही सारी अंतर्गत भानगड कुणीतरी 'इनसायडर'नेच मुद्दाम लीक केल्यानेच त्याची खमंग चर्चा सुरु झालॆ. खरेतर अशा गॉसिप गावगप्पांकडे बड्या पदावरील, ज्येष्ठ मंडळींनी दुर्लक्ष करायचे तर दिलीप तिवारी यांचा संयम व तोल सुटला. त्यांनी संपादकपदालाच काय कोणत्याही सामान्य, सभ्य माणसाला जाहीर चर्चेत वापरायला योग्य नाही, अशी हीन पातळीची भाषा जळगावातील पत्रकारांच्या व्हॉटस अप ग्रुपवर वापरली आहे. आश्चर्य म्हणजे ते जळगावात लोकमत किंवा सकळ किंवा 'महाराष्ट्र टाईम्स'चे संपादक होणार, अशी चर्चा असताना त्यांच्या या गावगुंड पद्धतीच्या शिवराळ, पातळी सोडून, हीन भाषेच्या वापरामुळे सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे.

दिलीप तिवारी यांचे  पत्रकारांच्या व्हॉटस अप ग्रुपवरील लिखाण असे -


मित्रहो, नमस्कार। माझ्या संदर्भात काही मंडळी नवनवी माहिती इतरांना पुरवत आहेत। त्यात काहीही अफवा, फसवणूक वाटली तर माझ्याशी थेट बोला 9552585088। कोणता मादरचोद म्हणतो, माझा राजीनामा घेतला?  माझ्या राजीनाम्याविषयी फार चौकशा करू नका। जास्त माहिती हवी असेल तर माझ्याशी बोला। मी 'संपादक फोरम'चा सदस्य नाही,  त्यामुळे अफवा पसरवणा-या हरामखोरांना थेट उत्तर देवू शकतो, मग ते बिभीषण असोत की शत्रू पक्षाचे असोत....दिलीप तिवारी
..............................................

मित्रहो, 'गोलाणी'तील काही भामटे पत्रकार वरील चर्चा करतात, अशी विश्वसनीय माहिती मला मिळाली आहे. प्रसंगी संबंधिताचे नाव येथे जाहिर करेन. ही बदनामी करणारी पैदास कोण आहे, हे शोधण्यासाठी मला तातडीने त्यांचे नाव कळवा.- दिलीप तिवारी
........................................


इंटरनेटवर काही शिखंडी, भामटे, नपुंसक पत्रकार दुस-याविषयी मनघडत कहाण्या लिहीतात. ते सुद्धा  छक्के आहेत, ओळख लपवून इंटरनेटवर लिहिणारे हे तथाकथित कधीही पेपरात लिहीत नव्हते बर का!!!
.......................................


आमच्यातला एक भडवा दुस-या दलालाला खोटी माहिती द्यायचा आणि तो दलाल इंटरनेटवर काहीही लिहायचा. ही पिलावळ नावाने का लिहीत नाही? कारण फोरम मधील दुबळे उत्तर देत नाहीत. मी मात्र या शिखंडीना आव्हान देतो, माझे आणि तुमचेही नाव घेवून लिहा...कळू दे  कोण मर्द कोण षंढ...????(बहुधा असे गृपमध्ये कोणीही नसेल)
......................................

कृपया खालील शब्दांची अर्थ सांगावेत -

नपुंसक
नामर्द
हिजडा
छक्का
शिखंडी
गे

मित्रहो, पत्रकारात हे पंथ वाढले आहेत. दुस-यांच्या नावाने तिसरा-याची निनावी बदनामी करणारी ही मंडळी तुमच्या अवती भोवती असू शकते. नाव न घेता प्रचार, बदनामी, अफवा निर्माण करणा-यांना ओळखा. ऐकीव माहितीवर बदनामी करणारे वरील बहाद्दर ज्येष्ठ ही असू शकतात. या शिखंडीना माझे जाहिर आव्हान आहे, एक बापाची औलाद असाल आणि डब्याचे नाहीतर तुमच्या आईचे दूध प्याला असालतर माझ्यावर थेट वार करा...आहे का हिंमत...


'संपादक फोरम'चा उल्लेख तिवारी यांनी वारंवार त्यांच्या शिवीगाळ, वैताग व त्राग्यात केला आहे. चर्चा अशी आहे की, जिल्ह्यातील आघाडीच्या दैनिकातील पाचोरा येथील पाच पत्रकारांनी आयपीएल सट्टा बेटींगची मालिका चालवून तेथील पेढीवाल्या एका व्यक्तीकडून पाच लाखांची खंडणी मागितली. पेढीवाली व्यक्ती सर्व पुरावे घेवून पोलिसांकडे तक्रार करायला निघाली होती. मात्र, वर्तमान नव्हे तर भविष्याचे पत्र काढणारया व 'एमआयडीसी'मध्ये छापखाना असलेल्या एका प्रकाशनाच्या स्थानिक संपादकाने त्याच्या कार्यालयातच खंडणीबहाद्दर पत्रकार, तक्रारदार यांची 'सेटलमेण्ट' घडवून आणली व प्रकरण मिटविले. या प्रकाशनाचा वार्ताहरही खंडणी प्रकरणात अडकलेला होता. या 'सेटलमेण्ट' नाट्याची जिल्हाभरात खमंग चर्चा सुरु होती. पत्रकारांच्या व्हॉटस अप ग्रुपवरही ही चर्चा रंगली होती. तिवारी हे संपादक असल्याने त्यांनी राजीनाम्याच्या चर्चेचा अर्थ खंडणी प्रकरणाशी जोडला. आपण 'संपादक फोरम'चे सदस्य नाही, असा अनावश्यक खुलासाही त्यांनी केला.

तिवारी यांच्या त्रागा, वैताग व शिवीगाळावर व्हॉटस अप ग्रुपवरच आलेली ही एक प्रतिक्रिया -  "तिवारी साहेब नमस्कार, सर्व पोष्ट वाचल्या.तुमचा संबंध कोठेच नसताना तुम्ही एकदम आक्रमक झालात. का ते समजले नाही?"

मुंबई ब्युरो चीफ उद्धव ढगे-पाटील यांचा 'देशदूत'ला रामराम!

नवा धंदा नवी लोकं