मधुकर भावे यांना 'प्रहार'मधून निरोप

मुंबई - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. मधुकर भावे यांना अखेर प्रहारमधून निरोप देण्यात आलाय तर संपादक म्हणून विजय बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाबर  यांच्या पत्रकारितेची सुरुवात नवाकाळ मधून झाली, नंतर केसरी, लोकमत असा प्रवास करून नाशिकमध्ये पुण्यनगरीमध्ये 3 वर्ष निवासी संपादक म्हणून काम पाहिल्यानंतर पुढारीच्या ठाणे आवृत्तीत 1 वर्षांपासून बाबर कार्यरत होते, बाबर यांच्या नियुक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रहार आता आर्थिक डबघाईस आला आहे, कर्मचाऱ्याच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारी नाहीत, अपुरा कर्मचारी वर्ग आणि जे कर्मचारी आहेत  त्यांच्यात अजिबात  उत्साह नसल्यामुळे बाबर यांच्यापुढे एक कसोटी आहे. बाबर हार न मानता प्रहार कश्याप्रकारे चालवतात याकडे लक्ष वेधले आहे.