महाराष्ट्र १ ला पुन्हा भगदाड


मुंबई - मॅनेजमेंटच्या धोरणाला कंटाळून महाराष्ट्र १ मध्ये पुन्हा एकदा राजीनामा सत्र सुरु झालंय..पगार रेंगाळल्यानं क्राईम एडिटर सुधाकर काश्यपनं जानेवारीत सोडचिठ्ठी दिली. यानंतर चॅनेल मध्ये खऱ्या अर्थानं राजीनामा सत्र सुरु झालं. पाठोपाठ राहुल झोरी, शितोळेनं रिपब्लिकची वाट धरली. धुळप, चंपा गेल्यानं इंटरटेनर सावंतही घरी बसणं पसंत करु लागली. विनायक गेला तसा चॅनेलला भगदाड पडलं. तीन-तीन महिने पगार थांबल्याने कर्मचारी अत्यवस्थ आहेत. चॅनेल प्रोड्यूसर बढे, इनपूट हेड गणेश मोरे, एंकर अजिंक्य, सौरभनेही जय महाराष्ट्र केला. परचुरेही महिनाभरापासून घरीच आहे. श्रद्धा देसाई, कलीमनेही चॅनेलला जय महाराष्ट्र्र केलाय. दर्शनाचे दर्शनही कमी झालय. अचानक मॅनपॉवर कमी झाल्यानं मॅनेजमेंटने ट्रेनी भरायला सुरुवात केली. ट्रेनीसोबत काम करायला नाकी नऊ आल्यानं अनेकजण बाहेर पडू लागली, तर काहीजण सक्तीच्या सुट्टीवर गेले. काही दिवसापूर्वी संपादक हायपर टेंशनने हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे दोन-तीन दिवस सवाल पुण्याच्या पंकज जर्नलिझम स्कूल ने केलं. दोन दिवसाआड अनेकांच्या सुट्ट्या पडू लागल्या. आता फक्त तीन फिमेल एंकर बातम्या वाचत आहेत. कामाच्या ताणामुळे अनेकजण बाहेर शोधमोहिम राबवत आहे. असं कळतंय की सुंबरान कर्ताही वैतागून सोडून गेलाय. येत्या आठवड्यात अनेकजण राजीनामा टाकणार असल्याचं खात्रीलायक वृत्त बेरक्याकडे आहे. मॅनेजमेंटला अनेकजण कंटाळले आहेत. पगार रखडल्याने काही जण मॅनेजमेंटकडे गेले आणि कामबंद आंदोलनाची हाक दिली. यावर मॅनेजमेंटने कामबंद केल्याने पगार मिळणार नाही असे स्पष्ट केलं.
येत्या आठवड्यात राजीनामा सत्राच्या ब्रेंकिंगसहीत पुन्हा भेटू ! तोपर्यंत वाचत राहा बेरक्याच्या बातम्या !!