पत्रकार संरक्षण कायद्याचा उपयोग कुणाला ?

फडणवीस सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला खरा, पण राज्यात पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर या कायद्यानुसार कुठेही  गुन्हा दाखल झाला नाही. उलट  पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे. फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे, मात्र पोलिसच पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत.
उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर पोलिसांनी षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल केला तसाच गुन्हा आता अमरावतीचे  पत्रकार प्रशांत कांबळे  आणि ३ पत्रकारावर दाखल झाला आहे. गेल्या वर्षभरात किमान १५ ते २० पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत . पत्रकार संरक्षण कायदा आमच्यामुळे झाला याचे श्रेय घेणाऱ्या पत्रकार संघटनेनी फडणवीस यांचा सत्कार  करून चमकोगिरी केली असली तरी या संघटना अधिकृत आहेत का हे शोधावे लागेल. कारण काही संघटनेवर प्रशासक असताना नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरु आहे. देणग्या उकळल्या जात आहेत . जिल्ह्यात असलेल्या अनेक संघटना नोंदणीकृत नाहीत. ज्या संघटना नोंदणीकृत नाहीत, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याची मालमत्ता सरकराने ताब्यात घेतली पाहिजे. संघटेनच्या नावाखाली देणग्या उकळण्याऱ्या खिसेभरू पत्रकारांना आता आवरण्याची गरज आहे.
- चंद्रशेखर भांगे
 हडपसर,पुणे
मो- 7798517517