महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये बदल....नजिर शेख सिटी इन्चार्ज !


औरंगाबाद - पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये अचानक बदल करण्यात आले आहेत.विनोद काकडे याची चिफ रिपोर्टर पदावरून अचानक गच्छंती करण्यात आली असून,सिटी इन्चार्ज म्हणून नजिर शेख याची नियुक्ती करण्यात आली आहे.मंगळवारी 6 वाजता हा अचानक निर्णय घेण्यात आला  आणि अवघ्या काही मिनीटात बेरक्याच्या हाती ही माहिती आली.
नजिर शेख हा सन 2012 ते 2014 या काळात चिफ रिपोर्टर होता.सन 2014 मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम केलेल्या विनोद काकडे यास चिफ रिपोर्टर करण्यात आले तर नजिर शेख यास विद्यापीठ बिट देण्यात आले होते.पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर काकडेची चिफ रिपोर्टर पदावरून गच्छंती करण्यात आली आणि पुन्हा क्राईम रिपोर्टर करण्यात आले.फौजदाराचा पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आल्यामुळे  काकडे नाराज झाले आहेत तर दुसरीकडे हा बदल का करण्यात आला,याची माहिती बेरक्याच्या हाती लागली आहे.
नजिर शेख हे काही वर्षापुर्वी कोल्हापुरात पुढारीमध्ये रिपोर्टर होेते.त्यांचे आणि पद्मश्रीचे जुने संबंध आहेत.शेख यांना पुढारीमध्ये निवासी संपादकपदाची ऑफर होती.ते पुढारीत जावू नये म्हणून राजेंद्रबाबूनी नजिर शेख यास सिटी इन्चार्ज करून टाकले तर काकडेंना मूळ पदावर आणले.या अचानक बदलामुळे महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये चर्चेला उधाण आले आहे.