विश्वास नांगरे - पाटील यांना "आदित्य गौरव "पुरस्कार घोषित

औरंगाबाद - आदित्य प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणारा "आदित्य गौरव "पुरस्कार विश्वास नांगरे - पाटील   (अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई )यांना घोषित झाला आहे .मागच्या वर्षी हा पुरस्कार समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला होता.
आदित्य प्रकाशनाचे संचालक विलास फुटाणे यांच्या संकल्पनेतून सकालेला हा पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो . विश्वास नांगरे पाटील यांनी २३/११ ला जो मुंबईवर आतंकी हल्ला झाला होता .तो हल्ला त्यांनी
तळहातावर प्राण घेऊन रोकला.होता त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले .त्याच्या या कर्तव्य कठोर कार्याबद्दल त्याना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments