खांडेकरांकडून अकोला, अमरावतीची झाडाझडती

दिव्य मराठीचे निवासी संपादक प्रेमदास राठोड यांचे कारनामे सतत कानावर येऊ लागल्याने स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर अचानक अकोला, अमरावतीच्या दौ-यावर आले आहेत. दिव्यच्या टीम मध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न राठोड सतत करीत आहेत. त्यांच्या या राजकारणाला कंटाळून अकोल्यातील काहींनी थेट खांडेकरांना रिपोर्टिंग केले. त्यामुळे संभाव्य डिजास्टर मेनेजमेंटसाठीच खांडेकरांना यावे लागल्याची चर्चा आहे. तुम्हाला कुणापासून त्रास असेल तर कोणताही मुलाहीजा न बाळगता थेट सांगा, असेच खांडेकरांनी आवाहन केले.
अमरावतीत चापोरकर, भट यांचा बळी घेतल्यानंतर राठोडांचा अकोल्यात धुडघूस सुरु आहे. दोन देशपांडेंना त्यांनी आपसात टक्करीसाठी जुंपवून दिले आहे. अकोल्यात रिपोर्टरचे दोन परस्पर विरोधी गट तयार झाले आहेत. त्यांच्या कारवायांना राठोड हवा देत आहेत. हे सर्व जाणून घेण्यासाठीच खांडेकर कालपासून अमरावतीत तळ ठोकून होते. तेथे राठोडांना नो एन्ट्री होती. आता खांडेकर अकोल्यात तळ ठोकून आहेत. अनेकांनी अकोल्यातील गचाळ राजकारणाचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. काही तर रजेवर गेले व आपली नाराजी दाखवून दिली. अमरावतीत खांडेकरांनी त्यांच्या विश्वासपात्रांशी होटेलात भल्या पहाटॆ चर्चाही केल्याचे कळले. बेरक्याने बातमी दिल्यानंतर राठोडांनी रिपोर्टर्सकडून पार्ट्या खाणे बंद केले. आपली बिलेही ते आता खिशातूनच देत आहेत. पण त्याला उशिर झालाय. ही बाबही खांडेकरांना खटकली आहे. सिनीयर क्रम डावलून राठोडांनी काही ठिकाणी केलेला उपद्व्यापही लवकरच सरळ होणार आहे. खांडेकरांना साधा रिपोर्टर निवडताना ईतके परखता. संपादकाची निवड कशी चुकली. अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूरचे सगळे संपादक नको असा अप्रत्यक्ष संदेश देत असताना आपण काय आणखी चांगले लोक सोडून जाण्याची प्रतीक्षा करीत आहात का?