वागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे...

आयबीएन - लोकमतची मुहुर्तमेढ रोवण्यात निखिल वागळे यांचा सिंहाचा वाटा आहे,हे कोणी नाकारू शकत नाही.आयबीएन - लोकमत म्हणजे निखिल वागळे आणि निखिल वागळे म्हणजे आयबीएन - लोकमत हे जणू समीकरण झाले होते.
मात्र वर्षभरापुर्वी निखिल वागळे यांना आयबीएन - लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची जागा मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांनी घेतली.
मात्र मंदार फणसे आणि महेश म्हात्रे चॅनलमध्ये आल्याचे अनेकांना रूचत नव्हते आणि पचनीही पडत नव्हते...
आयबीएन - लोकमतच्या सर्व गुप्त गोष्टी निखिल वागळे यांना सांगण्याचे पाप काही पापभिरू कर्मचारी करत होते.एव्हडेच काय रात्रीच्या डिबेटला एखांद्या गेस्टला दुसरीकडे जाण्याचे महापापही काहीजण करत होते.त्यात वागळे यांचा पंटर आशिष दिवाना करत होता.
आयबीएन - लोकमतच्या संस्थेचा पगार घेवून आणि केवळ संस्थेमुळे मोठे झालेले पापभिरू संस्थेची हानी करत होते.संस्थेची बित्तंमबातमी वागळेंना पोहचवण्यात या पापभिरूंचा हातभार होता.वागळे यांना व्देष आणि इर्षेपोटी केवळ आयबीएन - लोकमत डॅमेज करायचे आहे.परंतु त्यांच्या गळाला आतापर्यंत फक्त तिघेजण लागले आहेत,एक आशिष जाधव,दुसरा विनायक गायकवाड आणि तिसरा गणेश मोरे.संस्थेने वारंवार सूचना देवूनही त्यांच्यात काही फरक पडत नव्हता आणि अखेर वागळेजी तुम्ही पोसा आता म्हणत फणसे आणि म्हात्रे यांनी या तिघांचे राजीनामे घेतले आहेत.
वास्तविक वागळे यांच्या चॅनलची अजूनही कसलीच बांधणी नाही.फक्त चॅनल काढणार आहेत,एव्हडीच काय ती हवा.
चॅनलसाठी प्रथम केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते.ती मान्यता नाही.किमान ५० कोटी रूपये लागतात,ते बजेट अजून उपलब्ध नाही.स्टुडिओचं सोडा साधे ऑफीस सुध्दा नाही.कुठल्या तरी हॉटेलमध्ये चर्चा करून चॅनल सुरू होत नाही.
माणसे भरती करण्याची प्रक्रिया शेवटची आहे.पहिल्यांदा नाव आणि स्टुडिओ तर उभा करा...उगी चॅनल सुरू करणार आहे,तुम्ही या म्हणून माणसे फोडण्याचे काम सध्या सुरू आहे.त्याला वागळेंचे दिवाने झालेले काही आशिष बळी पडत आहेत...हे तर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असे झाले...
असो,बेरक्याच्या हातात निखिल वागळे यांना आयबीएन -लोकमतची बित्तंमबातमी देत असताना,काही फोटो सापडले आहेत.आता कोण आहेत,हे पापभिरू हे तुम्हीच ओळखा... 

........
आपल्याला 6 महिन्यात खुप त्रास झाला ,अस IBN लोकमतचे आशिष दिवाने यांनी आपल्या "राजी"नामा पत्रात म्हटलय . मात्र मागील वर्षभरात विविध चैनल्सच्या मालकांपुढे गोंडा घोळत चपला झिजविन्याचा त्रास आशिष दिवानेना का झाला नाही? 
त्रास होत असल्याने आपण राजीनामा देऊन आपल्यातला सृजनशील पत्रकार जीवंत ठेवल्याची मल्लिनाथी मिरवणाऱ्या आशिष दिवानेच्या फुग्यातील हवा महिन्याभरापूर्वीच काढली गेली होती 
अनेक मंत्र्यांची हाजी हाजी आणि नको तिथे नाक खुपसण्याचा आवडता छंद जोपासणारा आशिष दिवाने कामाकडे लक्ष देत नसल्याचा लक्षात आल्यामुळे संपादकांनी ( थेट काढता येत नसल्यामुळे ) दिल्लीला जाण्यासाठीची ऑफर दिली होती . त्या नंतर ही जाधवगिरी थांबत नसल्याने अखेर काल संपादकांनी पगारवाढ नाकारली आणि ही बाब बाहेर येण्याआधी आशिष दिवानेनी राजीनामा देऊन चॅनलमधून काढता पाय घेतला.
स्वतःला प्रामाणिक म्हणणार्या आशिष दिवानेला चिक्की प्रकरणाची पहिली बातमी मिळाली होती.मात्र स्वतःला फार हुशार समजणाऱ्या या महाभागाने ती बातमी एका नवख्या महिला सहकार्याला सांगितली आणि स्वत:वरची जबाबदारी झटकली ,हां जर एवढा अनुभवी पत्रकार होता तर अशी मोठी बातमी संपादकाला कळवायची असते हे ही याला कळल नसेल का ?
पण चिक्कीला यालाही चिपकायच होत म्हणून हां चिपकू सगळ करून नामानिरळा राहिला..
अश्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला,हे योग्यच झाले...