बेरक्या इफेक्ट

बेरक्याने दि. ७ मे  रोजी  बाबुजी, 'भाऊ'ला मारा धक्का ! मगच होईल 'मानबिंदू' पक्का ! हे वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचून एडिटर इन चीफ असलेल्या बाबूजींनी ८ मे पासून संपादकीय विभागातील सर्व कर्मचारी, ब्युरो मधील सर्व रिपोर्टर यांना   वन टू वन बोलावून भाऊ आणि एकंदरीत कामाविषयी म्हणने जाणून घेतले . त्यानंतर आज बुधवारी मराठवाड्यातील पाच जिल्हातील जिल्हा प्रतिनिधीस बोलावण्यात आले आहे. त्यांनाही वन टू वन बोलावून   त्यांची कैफियत जाणून घेण्यात येणार आहे.
गेले तीन दिवस वन टू वनचा  सिलसिला सुरु आहे. अनेकांनी भाऊ च्या मनमानी आणि एकंदरीत कार्यशैलीबद्दल  बाबुजींकडे  तक्रार दाखल केली. आता बाबूजी भाऊंवर काय  कारवाई करतात, याकडे लक्ष वेधलंय ..