पत्रकारांना मूर्ख समजता काय?

चमकोगिरीनंतर आता एस.एम. देशमुखांची भंपकगिरी...

एस. एम. देशमुख यांनी विविध पत्रकार संघटनांच्या नावावर सुरु केलेल्या चमकोगिरीबद्दल तसेच या संघटनांच्या माध्यमातून वर्षानुवर्षांपासून ते मिळवत असलेले आर्थिक लाभ आणि शासकीय पदांबद्दल काही दिवसांपूर्वीच बरेच काही प्रकाशित झालेले आहे.

आता, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कथित वक्तव्याचा लाभ उठवत पुन्हा चमकोगिरी करण्याचे या पत्रकारांच्या नेत्याचे (?) प्रयत्न धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. पत्रकारांमध्ये पितळ उघडे पडू लागल्याचा प्रकार सर्वांच्या विस्मरणात जावा यासाठी, अशा एखादं घटनेची जणू वाटच पाहत बसलेल्या या नेत्यांने (?) या मुद्दावरून चमकोगिरीचा प्रयत्न केला खरा!, पण यांची पक्की लायकी कळलेली असल्याने कोणत्याही प्रमुख वृत्तपत्राने यांची कसलीच दाखल घेतली नाही; परिणामी यांचा डाव पुरता फसला आणि ते पुन्हा तोंडावर पडले. पण, पत्रकारिता न करताही पत्रकारांचे निव्वळ नेते(?) म्हणून मिरवणारे हे एस. एम. देशमुख हे पत्रकारांना निव्वळ मूर्ख समजत आहेत की काय असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

‘मराठी पत्रकार परिषद’ या संघटनेला नियमबाह्यपणे ताब्यात घेऊन त्या संघटनेच्या या स्वयंघोषित अध्यक्षांनी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या पत्रकारांविरोधातील वक्तव्याच्या निषेधार्थ कांबळे यांच्या मोबाईलवर निषेधाचे एसएमएस पाठविण्याचे आवाहन केले होते. पण या देशमुखांची चमकोगिरी आणि पद्लोलुपता ओळखलेल्या पत्रकारांनी आणि माध्यमांनीही त्यांना फारसे महत्व दिले नाही. पण आपणच किती शहाणे आणि मोठे नेते हे दाखवण्यासाठी या देशमुख महाशयांनी आता, अत्यंत बालिशपणा करत राज्यमंत्री कांबळे यांना सात हजारांच्यावर पत्रकारांनी एसएमएस पाठविल्याचा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. अशा विविध पोस्टही त्यांनी अनेक वाटसअप ग्रुपवर टाकलेल्या आहेत. हा दावा म्हणजे हे महाशय पत्रकारांना आता किती मूर्ख समजायला लागले आहेत, हेच दर्शविणारे आहे. कशाच्या आधारावर त्यांनी हा आकडा काढला. सात हजार पत्रकारांनी एसएमएस पाठवून ते पाठवल्याचे यांना सांगितले का? की दिलीप कांबळे यांनीच त्यांना सात हजार एसएमएस आल्याचे सांगितले, असे एक ना अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित होतात. पण राज्याच्या काना-कोपऱ्यातील पत्रकारांचा आपल्याला पाठिंबा आहे, आणि आपणच सर्व पत्रकारांचे नेते आहोत, असे हिडीस प्रदर्शन करीत नेते- अधिकारी आणि काही हौशे-गवसे पत्रकार यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी हे देशमुख महाशय नेहमी असेच धंदे करत असतात.

प्रत्यक्षात यांच्यासोबत खरी पत्रकारिता करणारे बोटावर मोजण्याइतपतही पत्रकार नाहीत. ज्यांना हे पदांचे हाडूक देतात किंवा पदाचे आमिष दाखवतात तेच पत्रकार(?) यांचा उदो-उदो करताना दिसतात. अनेक ठिकाणी पत्रकारांमध्ये आपआपसात भांडणे लाऊन द्यायची आणि मग, ‘कधी या तर कधी त्या’ गटाला हाताशी धरून आपली चमकोगिरीची दुकान चालवत राहायची, ही यांची पध्दत! एखादं शहरात किंवा जिल्ह्यात पत्रकारांमध्ये असलेले वाद यांनी मिटवलेत अशी उदाहरणे शोधूनही सापडणार नाहीत. पत्रकारांना आणि विविध ठिकाणच्या सर्वच पत्रकार संघटनांना आपल्या सोयीनुसार वापरण्याचा आणि त्यांच्याकडून विविध कार्यक्रमांच्या नावाखाली पैसा काढण्याचा यांचा जुनाच धंदा आहे.

पत्रकारांमध्ये भांडणे लावणे, नेहमी स्वत:कडेच विविध पदे राहावीत यासाठी वाट्टेल त्या थराला जाणे, विविध जिल्हे आणि तालुक्यातून पैसा गोळा करणे, हे यांचे खरे धंदे आता सर्वांच्या लक्षात आले आहेत. असा हा सारा प्रकार असताना, कोणत्या सात हजार पत्रकारांनी यांच्या आवाहनाला साद घालत राज्यमंत्री कांबळे यांना एक रुपया खर्च करीत निषेधाचा एसएमएस पाठवला असेल? पण हजारो पत्रकार आपल्या मागे आहेत, असा भपका दाखवण्यासाठी ही सारी धूळफेक सुरु आहे! आमचा मुद्दा चुकीचा असेल तर कोणत्या सात हजार पत्रकारांनी हे एसएमएस पाठवले, त्यांची नावे या शेमsss शेमsss देशमुख महाशयांनी जाहीर करावीत.


-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)