शेम -शेम !

बीडच पार्सल सोलापुरात एका पोरीला पटवून अलिबागला गेलं...तिथं बायको असताना मनमानसीचा मुका घ्यायला गेला आणि चांगलाच मुखभंग झाला, मालकाने प्रकरण मिटवले नसते तर मराठवाड्यातुन कोकणात गेललं हे पार्सल जेलात गेलं असतं ! 
वास्तविक हे पार्सल ज्या पेपरमध्ये काम करत होता, त्याचा खप फार फार तर 3 हजार! पण मालकाचे इतर व्यवहार संभाळन्यासाठी त्याचा उपयोग होत होता, पण मालकाला चुना लावत याने पुण्यात अलिशान फ्लॅट घेतला, लाखो रुपयांचे फर्निचर केले ...
मालकाला या पार्सलची सर्व धंदे कळाल्यानंतर त्याने एकेदिवशी हाकलून लावले तर तो मालकाच्या विरोधी दैनिकात पाय चाटत गेला, पण एक वर्षाच्या आतच त्याही  मालकाने हाकलून लावले !
त्यानंतर याला कोणी विचारत नाही ! जिकडे तिकडे नो एन्ट्रीचा बोर्ड ! म्हणून हा  पत्रकाराचा स्वयंघोषित नेता बनलाय !
पहिले कार्याध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष ही परंपरा याने मोडून  खाल्ली ! आणि संस्थेचा मालक होवू पाहतोय ..
याच्याकडे कोणता पेपर नाही, म्हणून संघटनेच्या नावावर दुकानदारी सुरू केली  आहे, 
त्याच्या उजव्या चमच्याकडेही कोणताच पेपर नाही, तो मंत्रालयात दलाली करतो, कोकणातील डाव्या  चमच्याकडेही कोणता पेपर नाही तरी तोही संघटनेच्या नावाखाली दुकानदारी करतो !

याचे सभासद कोण तर जे कुठंच काम करत नाहीत असे पत्रकार ! ज्यांचा पेपर फक्त माहिती कार्यालयात दिसतो, असे पत्रकार ! पत्रकार कसले दलाल !! 
किती श्रमिक पत्रकार याचे सभासद आहेत  ?
कोकणातील हाकलून लावल्यावर हे पार्सल आता  पुण्यात आले आहे! कमाईचे कोणते साधन नसताना फिरायला कुठून येतो पैसा ? आणि म्हणे मी खिश्यातुन खर्च करतो ? हे कोणाला खरं वाटते का ?
फक्त चमकोगिरी करणे, संघटनेेच्या नावाने देणग्या उकळणे इतकेच काम सुरू आहे,
याने न्यास ऑफिसला ऑडिट रिपोर्ट सुद्धा दिला नाही, व्यवहार चोख होता तर का दिला नाही ? याला का दिला नाही म्हणून विचारले तर प्रश्न विचारणाऱ्यावर तोंडसुख घेतो !
याला दुसर्याचे बघायचे वाकून आणि स्वतःचे ठेवायचे झाकून अशी सवय आहे ! 
याच्या विरुद्ध कोण काही बोलले की, मुद्द्याचे सोडून दुसरेच उत्तरे देतो ! 
याची ही जुनी सवय आहे ! याने अनेकांना नाहक बदनाम केले आहे ! 
माहिती संचालक मानकर साहेब यांनी याच्या दिवाळी अंकास जाहिराती बंद केल्या म्हणून याने त्यांची बदनामी केली,मुख्यमंत्री यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख याना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अधिस्वीकृती कमिटीच्या निवडणुकीत तोंडावर पडला म्हणून यदु जोशी  विरुद्ध गरळ ओकला , मुंबई मराठी पत्रकार संघ मोजत नाही म्हणून देवदत्त मटाले यांच्याविरुद्ध मोहीम चालवली !  आजतकचे साहिल जोशी, टीव्ही मीडियाचे विलास आठवले यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला ...
निवडून आलेल्या चंद्रशेखर बहिरे यांना बदनाम करून राजीनामा देण्यास भाग पाडून स्वतः अनधिकृत पदावर बसला ! नांदेड मध्ये पत्रकार विरोधात गेले म्हणून केशव घोणसे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला ! 
 अशी किती तरी उदाहरणे आहेत ! 
कोकणात तर याने अनेकांना बदनाम केले आहे ! पत्रकारांत आपापसात भांडणे लावून हा स्वतःची पोळी शेकून घेतो !
हा पत्रकार नेता नव्हे पत्रकारांचा कर्दनकाळ आहे !

शेम शेम !!