सुशील कुलकर्णी झाले पुढारी !

औरंगाबाद -  एक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुढारीला मराठवाड्यात अजून तरी जम बसवता आलेला नाही, दुसरीकडे संपादक बदलण्याचा सिलसिला सुरूच आहे. आता सुशील कुलकर्णी   यांची  निवासी संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून,  कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांची लवकरच कोल्हापूरला बदली होणार आहे.
औरंगाबादेत पुढारी सुरू होण्यापूर्वी भालचंद्र पिंपळवाडकर यांची निवासी संपादक म्हणून निवड करण्यात आली होती,मात्र पिंपळवाडकर पुण्यनगरीत  गेल्यानंतर मंगेश देशपांडे, सुशील कुलकर्णी यांना ऑफर लेटर देण्यात आले होते, मात्र दोघेही जॉईन झाले नव्हते, देशपांडे  एकमतमध्येच लातुरात राहणे पसंद केले होते तर सुशील कुलकर्णीही एकमतमध्ये औरंगाबाद आवृत्तीसाठी  जॉईन झाले होते, जेव्हा पुढारी प्रत्यक्षात सुरू झाला तेव्हा सुंदर लटपटे कार्यकारी संपादक तर मुकुंद फडके निवासी संपादक म्हणून जॉईन झाले होते, मात्र अवघ्या तीन महिन्यात लटपटे यांनी राजीनामा देवून समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्यावर घणाघाती आरोप केला होता,  त्यांच्या जागी धनंजय लांबे यांची नियुक्ती होताच फडके यांची कोल्हापूरला बदली झाली  होती, मात्र येत्या 15 मार्च रोजी फडके पुढारीतून बाहेर पडणार असून, त्यांच्या जागेवर धनंजय लांबे कोल्हापूरला जाणार आहेत, इकडे औरंगाबादला निवासी संपादक म्हणून सुशील कुलकर्णी आज जॉईन झाले  आहेत,
 कुलकर्णी हे मूळचे बीडचे.. दैनिक गावकरीमध्ये अनेक वर्षे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर त्यांची औरंगाबादेत पुण्यनगरीचे निवासी संपादक म्हणून नियुक्ती झाली होती,  त्यानंतर त्यांना कार्यकारी संपादक म्हणूनही पदोन्नती मिळाली होती,दीड वर्षांपूर्वी ते पुण्यनगरीतून बाहेर पडून एकमतमध्ये गेले होते मात्र सहा महिन्यातच एकमतचे दिवाळे वाजले होते, त्यानंतर कुलकणी  सहा महिने विजनवासात होते, अखेर त्यांना पुढारीत निवासी संपादक म्हणून संधी मिळाली आहे, यापूर्वी मिळालेली संधी त्यांनी स्वतः हुन घालवली होती, आता मात्र त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
 पुढारीला मराठवाड्यात जाहिरात व्यवसाय हवा आहे, आणि सुशील कुलकर्णी त्यात माहीर आहेत, पद्मश्रीने केवळ याच गुणवत्तेवर त्यांच्याकडे मराठवाड्याचे पुढारपण सोपवले आहे. 
जाता जाता
सुशील कुलकर्णी पुढारीत जॉईन झाल्यामुळे  काही कर्मचारी अस्वस्थ झाले असून, काहीजण स्वतःहून राजीनामा तर काहींची मालकाकडून विकेट पडण्याची शक्यता आहे.त्यांच्यामुळे नवा गाडी नवा राज सुरु होणार आहे, हे मात्र नक्की