जेष्ठ पत्रकार जुगलकिशोर शर्मा यांचे निधन

वाशीम - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नीत असलेल्या कारंजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार जुगलकिशोर राधाकिसन शर्मा (६१) यांचे १७ ऑक्टोंबर २०११ रोजी सकाळी दु:खद निधन झाले.
    जुगलकिशोर शर्मा हे अनेक वर्षापासून तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. राज्य शासनाकडून त्यांना अधिस्वीकृती धारक पत्रकार म्हणून मान्यता होती. तसेच गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या पत्रकारीतेचा वारसा घेवून त्यांची दोन्ही मुले साप्ताहिक जनता परिषद व दैनिक जय जन भारती या वृत्तपत्राव्दारे निष्ठेने जनसेवा करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यामध्येच त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,
दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळचे दरम्यान हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांचेवर शेकडोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला अ.भा. मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष माधवराव अंभोरे, विदर्भ सरचिटणीस सिध्दार्थ शर्मा, आ. प्रकाश डहाके, नगराध्यक्ष विजय बगडे, जिल्हा माहिती अधिकारी अर्जून गुडदे, पत्रकार राजेंद्र मानधना, आर.आर. गाडेकर, वसंतराव कुळकर्णी, सुनिल मिसर तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरीक आदींची उपस्थिती होती. शर्मा यांच्या दु:खद निधनामुळे कारंजा पत्रकार क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. 

Post a Comment

0 Comments