डी.एम. ब्युरो चिफच्या लवकरच बदल्या

औरंगाबाद - महाराष्ट्र टाइम्सच्या आममनामुळे दिव्य मराठीत अनेक जागा खाली होत आहेत.त्यामुळे गेली सहा महिने गलेलठ्ठ पगार देवून फुकट पोसलेल्या नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद ब्युरो चिफना औरंगाबादेत बोलाविण्यात येणार असल्याची चर्चा चालू आहे.
औरंगाबादहून दिव्य मराठीची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्यानंतर मराठवाड्यातील सर्वच ठिकाणी गलेलठ्ठ पगार देवून ब्युरो चिफ नेमण्यात आले.औरंगाबाद शहर आवृत्तीनंतर जिल्हा आवृत्ती निघण्यास तीन महिने लागले.त्यानंतर जालना,नंतर बीड व नंतर नगर आवृत्ती सुरू झाली आहे.नांदेड,परभणी,हिंगोली आवृत्ती सुरू करण्यासाठी नांदेडला प्रिंटींग युनिट टाकण्याची तयारी करावी लागणार आहे तर लातूर, उस्मानाबादसाठी एक तर लातूर किंवा सोलापूरला प्रिंटीग युनिट टाकावे लागेल.तरच या जिल्ह्यात वेळेवर अंक पोहचू शकतो.नांदेडला प्रिंटींग युनिट टाकण्याची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्र टाइम्सचे भूत मानगुटीवर बसले आहे.त्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे.
त्यामुळे गेली सहा महिने गलेलठ्ठ पगार देवून पोसण्यात आलेले नांदेडचे ब्युरो चिफ विनायक एकबोटे, लातूरचे अनिल पौलकर, उस्मानाबादचे आयुब कादरी तसेच परभणी, हिंगोलीच्या ब्युरो चिफच्या बदल्या औरंगाबादेत करण्यात येणार आहेत.सध्या सर्व ठिकाणी शहर प्रतिनिधीही आहेत, त्यांच्यावर काम भागविण्यात येणार असल्याचे समजते.आतापर्यंत या ब्युरो चिफनी एक अथवा दोन बातम्या देवून, फक्त पाट्या टाकण्याचे काम केले होते.ते काम आता शहर प्रतिनिधीही करू शकतात.
उस्मानाबादचे ब्युरो चिफ आयुब कादरी पुर्वी सकाळच्या औरंगाबाद कार्यालयात बरेच वर्षे होते.त्यांना दिलीप वाघमारे यांच्या रिक्त जागेवर डेप्युटी न्यूज इडिटर म्हणून घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.विनायक एकबोटे, अनिल पौलकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा दिव्य मराठीत चालू आहे.

Post a Comment

0 Comments