पत्रकारांची दिवाळी तर अधिका-यांचं दिवाळं...

सांगली - दिवाळी हा सण हर्षाचा आणि मागल्याचां असतो.मात्र  दरवर्षी दिवाळी ही सांगली जिल्ह्यातील नेते आणि अधिकाऱ्यांच दिवाळ  काढत असते. काही पत्रकारांनी ठेकेदार पद्धत सुरु केली आहे.  पानभर पत्रकारांच्या नावाच्या याद्या परस्पर तयार केल्या जातात . आणि सर्वांच्याच नावावर गठ्ठे हाणले जातात....
एरवी इलेक्ट्रोनिक मिडियाचे प्रतिनिधी व साप्ताहिकांचे पत्रकारांच्या नावाने बोंब मारणारे दिवाळीत मात्र त्यांच्या नावावर परस्पर वसुली केली करतात. मिळालेल्या रक्कमा आणि भेट वस्तू आपल्या पट्टीतील मोजक्याच लोकांना वाटायच्या आणि बाकी ' सब माल डीब्बेमे ' असा कारभार वर्षानु वर्षे सुरु आहे. यामूळे नेते आणि अधिकारी वैतागले आहेत.  हें सर्व धंदे चांडाळ चौकडीतील  चार पत्रकार करतात. आपल्या पेपरची आरोळी ठोकणारा पत्रकार हा या चौकडीचा नेता आहे. या कथित पत्रकार कडून गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेचा बाजार माडण्यात आला आहे. स्वताला पेपर मध्ये नीट बातम्या लिहाता येत नाही. आणि पत्रकारिताही करता येत नाही मात्र हा स्वयघोषित पत्रकार नेता दुसर्यांच्या नावावर गठ्ठे हानण्यात माहीर आहे. त्याच्या या कारनाम्यामुळे नेते आणि अधिकाऱ्यांरी वैतागले आहेत.आणि नवीन तरुण पत्रकारही वैतागले आहेत.

दुकानदारी बंद पडल्यामुळे नेता झाला हतबल : 
पत्रकारांची आपसात भांडणे लावून भाजतो आपली पोळी -
आज वर खोट्या आणि बोगस याद्या बनवून पत्रकारिता विकणाऱ्या कथित पत्रकारांचे बिंग फुटले आहे.त्यामुळे  तो आत्ता  इलेक्ट्रोनिक मिडियाचे प्रतिनिधीचे आणि दैनिकांच्या पत्रकारात भांडणे लावत आहे. पत्रकारांची आपसात भांडणे लावून तो आपली पोळी भाजण्याचे काम करीत आहे.

सकाळी नैतिकतेच्या गप्पा मारणारा अपशकून पत्रकार असतो रात्री दारूत  तर्र.....
वर्षानुवर्ष एकाच जागेवर सडत पडलेला हा आहे चांडाळ चौकडीतील अनिखीन एक पत्रकार.... आपली कर्तबगारी सिध्द करता येत नाही,मात्र दुसर्यांना तो उपदेष्याचे डोस पाजतो.  इलेक्ट्रोनिक मिडियाचे प्रतिनिधीचे आणि दैनिकाच्या तरुण पत्रकारावर तो नेहमी जळतो. स्वतः पाकिटांचे  गठ्ठे हाणतो, आणि स्वतः आपण साजूक असल्याचा आव आणतो. कधी अधिकारी तर आधी नगरसेवकांच्या कडून डेली दारू डोसतो.बसस्थानका जवळील बीअर बार मध्ये रोज रात्री पडीक असतो. फुकटची दारू इतकी पितो की त्याला नीट चालता ही येत नसते. पण तो स्वतः ला केवळ पत्रकार नव्हे तर आत्ता जेष्ठ पत्रकार समजू लागला आहे..

बिन पगारी आणि फुल अधिकारी आहेत  दोन फुकटे पत्रकार 
 वयाने अनुभव वाढतो असे म्हणतात. मात्र ह्यांचा फक्त गठ्ठे हानण्यात यांचा अनुभव वाढत आहे.पत्रकारिता म्हणजे पैसे वसूल करण्याच धंदाच यांनी मांडला आहे.एक तर बिन पगारी आणि फुल अधिकारी आहे.कामावर घेताना त्याला घेतले होते वेगळ्याच कामा करिता. मात्र चालक पणे त्याने पत्रकारिता सुरु केली. आणि दुसरा तर पगारावर पण नाही, आणि अधिकारावर ही नाही. मात्र आपण दोघे दोस्त आणि दुसर्याच्या नावावर गठ्ठे  मारु  मस्त असा त्यांचा धंदा आहे.पत्रकारिता कमी आणि नसते उदयोग तो अधिक प्रमाणात करीत असतो.

Post a Comment

0 Comments