सोलापूर महापालिकेबरोबर वृत्तपत्र सृष्टीतही रणधुमाळी

सोलापूर - दिव्य मराठीची सोलापूर आवृत्ती मार्चअखेर सुरू होत आहे.पण तत्पुर्वीच अंक देता येईल का, याचीही चाचपणी चालू आहे. कारण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या १६ फेब्रुवारी रोजी होत आहे.महानगर पालिकेच्या रणधुमाळीत सोलापूरच्या वृत्तपत्र जगतातही आता रणधुमाळी सुरू होणार आहे.
आता आपली मर्जी जाणून घेण्यासाठी येत आहे...दिव्य मराठी असे डिजीटल फलक सोलापूरच्या चौका - चौकात झळकू लागले आहेत.टीमच्या शोधासाठी स्टेट इडिटर अभिलाष खांडेकर बुधवारपासून हॉटेल त्रिपुरसुंदरीत ठाण मांडून आहेत. सकाळमध्ये विवेकच्या छळाला कंटाळून गेल्या काही दिवसापासून रजेवर असलेले संजीव पिंपकरकर दिव्याच्या आश्रयाच्या प्रयत्नात आहेत.त्यांना सकाळप्रमाणेच वृत्तसंपादक म्हणून जबाबादारी मिळण्याची शक्यता आहे.पॅकेज मात्र सकाळपेक्षा मोठे आहे.
पुढारीत चौधरीच्या गेमला बळी ठरलेले अभय दिवाणजी काही दिवसांपुर्वीच सकाळमध्ये जॉईन झाले आहेत.मात्र दिव्य मराठी येताच त्यांचे मनही चलबिचल होवू लागले आहे.ते दिव्य मराठीच्या संपर्कात असले तरी पिंपरकरमुळे त्यांना आता वृत्तसंपादकपद मिळणार नाही.फार तर ब्युरो चिफपद मिळेल.पॅकेज मात्र सकाळपेक्षा मोठे असेल.
पिंपरकरप्रमाणे विवेकच्या अन्यायाला कंटाळलेले उपसंपादक यशवंत पोफळे यांनी बुधवारी (शिफारस : यमाजी मालकर ) खांडेकरांची भेट घेतली.सकाळमध्ये त्यांना १७ हजार पगार आहे.दिव्याने त्यांना २५ हजार देवू केले आहेत. तसेच वरिष्ठ उपसंपादक म्हणून पद देण्याची ग्वाही दिली आहे.मात्र पोंपळेंचे तळ्यात-मळ्यात चालू आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम करणारे राजाराम कानतोडे हेही आता सकाळचा कान तोडून दिव्यात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत.
जिथे दिव्य मराठी, तिथे सकाळला फटका हे गणित ठरलेले आहे.यमाजी मालकर सकाळवर बंदूक रोखून आहेत.आतापर्यंत त्यांच्या गळाला पिंपरकर लागले आहेत.पोपळे, कानतोडे हेही लागतील.तसेच सर्व असंतुष्ट गट दिव्य मराठीत जाण्याची शक्यता आहे.
सकाळ पाठोपाठ लोकमत, संचारचे कर्मचारी दिव्य मराठीच्या संपर्कात आहेत.मात्र सोलापुरात फार तर २५ जणांचा संपादकीय स्टॉप राहणार आहे.कारण सोलापूर शहरासाठी फार तर ४ किंवा ६ पाने राहणार आहेत.जिल्ह्यासाठी फार तर ४ पाने वेगळी राहणार आहेत.
मुळ अंक १२ पाने प्लस सोलापूर शहरासाठी ४ किंवा ६ पाने असे १६ ते १८ पानांचा अंक राहणार आहे.आठवड्यातून तीन कॉमन पुरवण्या राहणार आहेत.सोलापूर आवृत्ती लाँचिंग झाल्यानंतर उस्मानाबाद, लातूर  जिल्ह्यासाठी सोलापुरातूनच अंक प्रिंट होणार आहे.

Post a Comment

0 Comments