दिव्य मराठीचे धुळ्यात लोटांगण ...

निप:क्ष आणि निर्भीड पत्रकारितेच्या गमजा मारत असलेल्या 'दिव्य मराठी'ने धुळ्यात एका 'किरकोळ' माजी महापौरासमोर सपशेल लोटांगण घातले आहे. पहिल्या पानावर जाहीर माफीनामा लिहून दिला आहे. संपादकाचे लक्ष नसले आणि संपादक दुबळा असला की काय होते, याचेच हे द्योतक आहे. यापुढे 'दिव्य'वाल्यांनी नसत्या फुशारक्या मारू नयेत. खरे पाहता 'दिव्य'मध्ये संपादकाचा रोल अतिशय वेगळा मानला जातो. मात्र जळगावातील निवासी संपादकाला धुळ्यात फारच रस आहे. त्यामुळे धुळ्याची जबाबदारी असलेल्या ब्युरो चीफला टांग मारली जात आहे. धुळ्याची जबाबदारी असलेले सुरेश उज्जैनवाल अजूनपर्यंत एकदाही तिकडे फिरकलेले नाहीत. या उलट स्वत: संपादक ५ वेळा धुळ्यात फिरून आलेत. वार्ताहर नेमताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, अशी उज्जैनवाल यांची तक्रार आहे. त्यामुळेच धुळ्यातील चुकीची जबाबदारी स्वीकारायला ते तयार नाहीत. धुळ्याचा संबंधित खुलासा छापताना माफी म्हणून नव्हे तर बातमी म्हणून छापा, असा उज्जैनवाल यांचा आग्रह डावलून संपादकांनी जाहीर लोटांगणं घातले. तिथले प्रमुख त्र्यंबक कापडे हे संपादकांचे खासमखास आणि जुन्या गुन्ह्यातील सहआरोपी आहेत. जळगावात 'दिव्य'चे काही खरे दिसत नाही, हे मात्र खरे!
ब्युरो चीफ यांना सकाळसारखा छुपा खुलासा हवा होता तर संपादकांना जाहीर लोटांगणं!

हाच तो दिव्य खुलासा

माजी महापौरांवर तो गुन्हा नाही
माजी नगरसेवक दिलीप चित्ते यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सिध्दार्थ भगवान करनकाळ यांच्यासह नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी पान 1 वर प्रसिद्ध झालेल्या बातमीत मजकूर बरोबर असला तरी शिर्षकात नजरचुकीने ‘दिलीप चित्ते यांना मारहाण; माजी महापौरांवर गुन्हा’ असे प्रसिद्ध झाले आहे. तथापि, माजी महापौरांवर या घटनेत कोणताही गुन्हा दाखल नाही. भगवान करनकाळ यांना झालेल्या मनस्तापाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
-निवासी संपादक

Post a Comment

0 Comments