राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवेदन

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या ११ जणांच्या शिष्टमंडळाने    नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा ताई पाटील यांची  भेट घेतली आणि महाराष्ट्रातील पत्रकारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्याच्या संदर्भात त्यांना निवेदन दिले .तसेच महाराष्ट्र मध्ये पत्रकारांना संरक्षण देण्याच्या संदर्भात कायदा करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा अशी अग्रही विनंती केली.यावर राष्ट्रपतींनी पत्रकारांना निर्भयपणे काम करता आले पाहिजे अशी  भावना व्यक्त करीत या संदर्भात  मी लक्ष घालते असे सांगितले .एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वा खाली राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात ,प्रफुल्ल मारपकवार,किरण नाईक,सुरेंद्र गांगण, प्रकाश पोहरे,अशोक वानखेडे,सुरेश भटेवरा,राजू वाघमारे,श्रीराम जोशी आदि उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments