दुसर्‍याची ती - बाई...

मातृदिनानिमित्त पुण्यात मुख्यालय असलेल्या साखळी दैनिकाच्या मुख्यसंपादकांनी पुरवणीची पाने रंगवून स्वतःच्या मातेची महती सांगताना साने गुरूजींच्या मातेला कमीपणा येईल अशी वक्तव्ये बेमालूमपणे लेखात व्यक्त केली आहेत. त्याचा पंचनामा बेरक्याने आपल्या शैलीत केलाच आहे. मात्र, महाराष्ट्रभर साहित्याचा पाईक म्हणून चेहरा लाभलेल्या या मुख्यसंपादकांची इतरांच्या बाई- बाळींविषयी खासगीतील मते अत्यंत खालच्यास्तरावरील आहेत, याचे अनुभव अनेकजण सांगतात. स्त्रीभ्रूण हत्येविषयी किंवा महिलांच्या सन्मानाच्या दिवशी (महिला दिन, मातृदिन वगैरे) मुख्यसंपादक अत्यंत चेव आल्यासारखे अग्रलेख पाडतात. (होय पाडतात हा शब्द एवढ्यासाठीच की सकाळी 12 गावच्या 12 संपादकांची विषय निवडण्यासाठी मोबाईल कॉन्फरन्स होते. आपल्या आवडीचा विषय घेऊन त्यावर मोजून मगत्यावर ओळी पाडल्या जातात. बर्‍याचवेळी चंद्रात भाकरी दिसत असल्याची उपमा वापरली जाते. कोणतीही ठोस भूमिका न मांडता गोल गोल मत मांडले जाते. आपलाच अग्रलेख आपणच 10 वेळा वाचून तो किती अभ्यासपूर्ण आहे, ही माहिती युवा मालकापासून इतर संपादकांना दिली जाते. जवळचे दोन-तीन भाट संपादक दुसर्‍यादिवशी अग्रलेख लोकांना आवडल्याचे सांगतात. गंमत म्हणजे आवडणारे कोण असतात ?  हे कधीही विचारले जात नाही. जावू द्या हे मुख्यसंपादकांच्या फिरस्तीत होणार्‍या विषयांतरासारखेच झाले). तर मी काय सांगत होतो...आई विषयी लिहीण्याचे पेटंट या मुख्यसंपादकांकडेच आहे. मग ते आई विषयी मजकूर पाडण्याची संधी पाहतात. आई विषयी लिहिण्यासाठी त्यांचे हात - बोटे शिवशिवतात... मात्र, आपल्या घरी (बंगल्यात) कोणी भेटायला आले तर बैठकीत समोर बसलेल्या आईला आत जायला सांगतात.
मुख्यसंपादक बायांविषयी कसे वागतात याच्याही कहाण्या अनेक जण रंगवून सांगतात. मूळात मुख्यसंपादकांच्या पत्नीचा नाशिक जिल्हा मराठा संस्थेतील सुरूवातीचा काळ अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. नाशिकच्या ओक बंगल्यात खालच्या खोल्यांमध्ये राहणारे संपादक कसे वागत? हे त्यावेळी तेथेच राहणारे इतर संपादकिय सहाकारी सांगतात.
मुख्यसंपादकांना महिला सहकारी भरण्याची भारी हौेस होती. सुरूवातीच्या काळात 5- 10 बाया बापड्या आल्या. मध्यंतरी दोन - दोन पहिला पीए होत्या. या महिलांचे अनुभव सुद्धा स्तंभीत करणारे आहेत. मुख्यसंपादक प्रत्येक महिला उपसंपादकास यल्लमा देवीचा कहाणी सांगत. त्यानंतर विषय नग्नपूजेकडे जायचा. मग, मला मारायला लोक आले... मी पोस्टमन कडून पैसे घेतले... तेथून जीव वाचवून पळालो...ही कहाणी रंगवून सांगत. तेव्हाच्या महिला, मुली नग्नपूजेसारखा विषय ऐकून बावचळून जात (कारण तेव्हा लैंगिक शिक्षण देण्याची अशी पद्धत नव्हती). काही कक्षाबाहेर येवून रडत.
एका महिला सहकार्‍यास मुख्यसंपादक चित्रपटाला घेवून गेले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्याशी वाद विकोपाला गेला. तेव्हा पुण्याहून महिला अधिकारी चौकशीसाठी आल्या. संबंधित मुलीने कोर्टांत दावा केला होता. त्यात तपशिल सेक्सशूअल हरॅशमेंटचा होता. बचावासाठी मुख्यसंपादकांनी सांगितले, होय मी कोर्टात सांगणार...माझे या मुलीशी शारिरीक संबंध होते. तेथे तीची बदनामी होईल. मला काय त्याचे...वकिल नवरा असलेल्या मुलीनेनंतर बदनामी टाळण्यासाठी माघार घेतली.
नासिकच्या एका प्रसिद्ध लॉ कॉलेजच्या माजी पदाधिकार्‍याच्या भाचीनेही मख्यसंपादकांच्या विषयी अशाच आशयाची तक्रार केली होती.
मुख्यसंपादकाच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी पुण्याहून त्यावेळच्या सरव्यवस्थापक (पुण्यातील मालकाच्या कोल्हापुरातील पुतणी) नासिकला आल्या. त्यांना मुख्यसंपादकांचे अनेक प्रताप कळले.
तेव्हा हे नासिक आवृत्तीचे संपादक असलेले महाशय सरव्यवस्थापक बाईंचा उल्लेख आमच्या कोल्हापुरातील बाई (त्या मॅडम कोल्हापुरातील होत्या) असा करीत. आणि पुढे पुस्ती जोडत की, कोल्हापुरात फडात नाचणार्‍या बाईला आम्ही बाई म्हणतो बरे...मालकाच्या पुतणीविषयी संपादक काय काय म्हणत...?
संपादकांनी स्वतःच्या पत्नीला फारशा कार्यक्रमातून कधी नेले नाही. साहित्य प्रांतात अध्यक्षपद पदरात पाडून घेतल्यानंतर नासिकमध्ये झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या दोघांचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्य पत्नीचा चेहरा कळला. नासिकच्याच एका मॉलमध्ये एका प्राध्यापिकेसह हे संपादक महाशय गेले होते. तेथे एका परिचिताने सोबत वहिनी वाटते, असे विचारले होते. त्यावर संपादक केवळ हसले (ही मूक संमती असावी का?) अखेर ती प्राध्यापिकाच ओशाळून नाही म्हणाली...

(ताजा कलम - दैनिकात पान 4 वर पशूहत्या बंदीचे गुळमुळीत समर्थन करणारा अग्रलेख लिहिणारे हे संपादक महाशय त्याच्या दुसर्‍या दिवशी दैनिकाच्या वर्धापनदिनाला मटणाची मागणी करीत. ते करताना कोल्हापूरच्या रस्सामटणाची मागणी करीत. त्यावेळी व्यवस्थापकही कोल्हापुरातील होते. मग दोघेही आम्ही कसे मटण दिले, यावरच गप्पा रंगवत असत..)