कोल्हापूर म.टा.चा जुलैमध्ये प्रारंभ

कोल्हापूर - महालक्ष्मी व ज्योतिबाच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक कोल्हापुरातून महाराष्ट्र टाइम्सचा प्रारंभ जुलैमध्ये होणार आहे.सध्या टीमची जुळवा-जुळव चालू आहे.
म.टा.च्या टीमसाठी कोल्हापुरात आतापर्यंत दोनदा मुलाखती झाल्या.संपादक अशोक पानवलकर व पुण्याचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी या मुलाखती घेतल्या.
संभाव्य टीममध्ये गुरूबाळ माळी, आप्पा माळी (तरूण भारत), इंदुमती गणेश (लोकमत), विजय पाटील,सचिन यादव, अनुराधा कदम, जान्हवी सराटे (पुढारी)यांचा समावेश राहणार आहे.
म.टा.चा सर्वाधिक फटका पुढारीला बसणार आहे.लोकमत,सकाळवर काही अंशी फरक पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.11 रूपयात चार महिने अंक, ही मटाची लॉचिंग स्कीम कोल्हापुरातही राबविण्यात आल्याने एक लाखाची नोंदणी पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले.