सामची खबरबात

मुंबई -साम वाहिनीमध्ये दोन वर्षांपूर्वी चंद्रमोहन पुपाला आणि गणेश कनाटेंच्या नेतृत्वाखाली नवी भरती झाली होती. दोन वर्षांपूर्वी तिथं नव्यानं जॉईन झालेली मंडळी आता स्थिरावली आहे. तर आधीची जुनी मंडळी मोठ्या संख्येनं कधीच बाहेर पडली आहे. तर ज्यांचं कुठंच काम होत नाही ते अशोक सुरवसे, सचिन फुलपगारे, प्रफुल्ल साळुंखे ही मंडळी आधीचे सोनेरी दिवस आठवत येणारा दिवस घालवत आहेत. ई टीव्ही आणि झी 24 तासमध्ये आपण कशा शिफ्ट लावायचो याचे किस्से एंक जण सांगत असतो. इथंही आधी त्याच्याकडे हेच काम होतं. मात्र हे काम आता निलेश कारंजेला सोपवण्यात आलं आहे. तर अशोक सुरवसे एक महिन्यापूर्वी झी 24 तासमध्ये इनपूट एडिटर पदासाठी मुलाखत देऊन आले. तिकडून कधी बोलावणं येतं ? या कडे अशोकरावांचं लक्ष लागलंय. अशोक सुरवसे जर झी 24 तासमध्ये गेले तर आपलंही तिथं काम होईल अशी आशा प्रफुल्ल साळुंखेला लागून राहिली आहे. अशोक सुरवसे गटाचा असल्याने चंद्रमोहन पुपाला आणि अशोक कनाटे त्याला स्थान देत नाहीत. आणि अशोक सुरवसेंचा साम मधला प्रभाव कधीच संपला आहे. त्यामुळे ही जुनी मंडळी जुन्या आठवणीतच रममान होत, नव्या ठिकाणी प्रयत्न करत असतात.

Post a Comment

0 Comments