अभय मोकाशींना बातम्यांचे 'गमक' काही जुळेना...

मुंबई : मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या  ' मुंबई मित्र ' दैनिकात आता ' मिड डे ' च्या अभय मोकाशीनी ' मैत्री ' केली आहे . संपादकीय विभागाचा धुरा आता तेच सांभाळत आहे. मात्र इतर दैनिकांचे काय आणि ' यांचे ' काय. (असो प्रत्येकाची आवड निवड , विचारशैली असते, ' नवाकाळ ' सारखे ) पण मुंबईच्या ' मार्केट ' मध्ये  टिकायचे असेल तर वृत्तसंपादन हे कलात्मक, आणि तिथल्या वातावरणाला अनुरूपच हवे. पण हेच गमक मोकाशींना काही जुळवता आले नाही. ' मुंबई मित्र ' ला मोकाशींची एन्ट्री झाल्यावर ' मित्र ' चे रूपच पालटे होवून काहीतरी नवीन, धडाकेबाज वाचायला मिळेल असे वाटत होते. पण ' यांचे ' अजून सूरच काही गवसत नाहीये. अंकात  अतिरिक्त  मोठ्या-मोठ्या फोन्टच्या  हेडिंग मधून यांना काय साधायचे ? असा प्रश्न पडून चक्क भ्रमनिराशा होते. मोकाशींनी तरुणाची फौज निर्माण केली. संपादकीय पानावर हे तरुण खर्या अर्थाने झुंजतायात. त्यात तिळमात्र शंका नाही.  त्यांचे दर्जेदार लिखाण वाखण्याजोगे असते पण मुळात वर्तमानपत्राचा ' आत्मा ' असलेला बातम्यांवर संस्कार केलेले दिसत नाहीच तर बातम्यांची सांगड , वृत्तसंपादनाचा  कडेलोटच झालेला दिसतो. आठवतोय तो मुंबई मित्र.. जेव्हा राजेश सावंत कार्यकारी संपादकपदी होते. तेव्हा तर मुंबई मित्राची एक्सप्रेस सुसाटss धावत होती. ' मुंबई चौफेर ' नेही देव पाण्यात ठेवले होते. ट्याबलेट मध्ये असणार्या तेव्हाच्या मुंबई मित्रला दुपारी १२-१ सुमारास स्टोलला पेपर दिसतच नसे. सावंत ' मित्र ' सोडून गेल्यानंतर सामनातून अजय महाडिक ' मित्र ' च्या  कार्यकारी संपादकपदी आले. महाडिकहि जरा ' अवली ' होते. त्यांच्या ' नजरांनी '  अनेकांची डोकेदुखी बनली होती. पण त्यांची सौरक्षणविषयक, जागतिक, राष्ट्रीय राजकारणावर लिखाणाची चांगली पकड होती. त्यानंतर बर्याच कालावधिनी मोकाशींची एन्ट्री झाली. तसे मुंबई मित्रचे मालक, समुह संपादक अभिजित राणे हि चांगलेच चर्चेत असतात. ' देण्या - घेण्या ' च्या बाबतीत ' मार्केट ' मध्ये पुरते नाव खराब आहे त्यांचे, पण एक हाती सत्ता लढवायची त्यांना चांगले जमले आहे. तिशीतल्या आत असलेल्या राणेंनी गेल्या ७-८ वर्षापासून मुंबई मित्र समूहाचे ४ -४ दैनिक काही का होईना चालवले आहे. हि एक जिकरीची बाब आहे.

Post a Comment

0 Comments