ठळक घडामोडी...

* लातूर - लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ निवडणूक : विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश दगडे आणि माजी अध्यक्ष पांडुरंग कोळगे यांची सपशेल माघार...परिवर्तन पॅनलचे अशोक चिंचोले आणि विजय स्वामी यांच्या विजयाचा मार्ग सुकर...

* मी मराठी  आणि  Live इंडिया या चॅनेलच्या स्ट्रींजंरचे थकलेले पेमेंट नुकतेच देण्यात आल. स्ट्रींजरना अपेक्षीत रक्कमेपेक्षा कमी पेमेंट देण्यात आल आहे. मात्र "भागते भूत की लंगोट सही" म्हणून स्ट्रींजर मंडळींनी समाधान व्यक्त केल. उर्वरित पेमेंट्साठी आता स्ट्रींजर तगादा लावणार आहेत.कांचन अधिकारी यांनी सुरू केलेल्या या दोन्ही चॅनेलला आधी HDIL ने घेतल होत मात्र आता समृद्धी जीवन ग्रुपकड या चॅनेलची मालकी आहे. त्यामुळे या दोन्ही चॅनेलकडून कर्मचा-याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे चॅनल पुन्हा प्रकाश झोतात येण्यासाठी समृद्धी ग्रुप प्रयत्नशील असल्याचे कळतय.

* प्रहार मुंबई चे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना मारहाण झाली आहे. आर.बी. आय.च्या प्रिमायसेस मध्ये फोटो काढायला बंदी आहे . पण घटनेचे गांभेर्य पाहता विनम्र त्या ठिकाणी फोटो काढायला गेले ..मात्र सुरक्षा यंत्रणेने त्यांना मारहाण केली. 

* नगर जिल्ह्यातील सकाळचे बातमीदार बेरक्याला लाईक करायलापण घाबरतात. बेरक्याला माहिती पुरविणारांचा शोध घेतला जातोय म्हणून दहशत आहे.बेरक्यामध्ये सकाळबाबत आल्यानंतर सकाळ वरमलाय. बातमीदारांशी हेळसांडीने बोलण्याचे प्रमाण घटल्याने हा बातमीदरांना सुखद धक्काच वाटतो. पण कदाचित वर्धापनदिनानंतर काही उलथापालथ होतील. 
वर्धा येथे पत्रकारांना पोलिसांची दमदाटी

* वर्धा - लोकमतचे पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम साळी यांच्या विरोधात काही बातम्या प्रसिध्द केल्याबद्दल चिडलेल्या साळी यानी पत्रकारांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना दमदाटी आणि शिविगाळ केली.सोमवारी हा प्रकार घडला.वर्धा येथील पत्रकारांनी या घटनेचा निषेध करीत आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेऊन साळी यांच्याकडून खुलासा मागवावा अशी मागणी केली.वर्धा येथेच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार पोलिसांच्या अरेरावीला बळी पडत आहेत.