अशा रिपोर्टरना काय म्हणावे....


उत्तराखंडमध्ये महाप्रलय होवून शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.अनेकजण बेपत्ता आहेत.जे बेपत्ता आहेत,त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.अनेकांच्या घरात शोकाकूल वातावरण आहे.ज्यांच्या घरातील कर्ता पुरूष,माता -पिता केले,त्यांच्या घरात काय दु:ख आहे,हे त्यांनाच माहित...ज्यांचे जळते,त्यांनाच कळते...
उत्तराखंडमधील परिस्थिती पाहून प्रत्येक भारतीय व्यक्ती दु:खी आहे,ठिकठिकाणी मदत निधी गोळा केला जात आहे.मात्र मीडियातील काही लोकांना त्याचे काही सोयरसुतक वाटत नाही,कव्हरेज करण्याच्या नावाखाली उत्तराखंडमध्ये गेलेले रिपोर्टर कसे वागत आहेत,त्याची काही उदाहरणे...

१. एका गरीब माणसाच्या खांद्यावर बसून, एका न्यूज एक्स्प्रेसच्या दीड शहाणाने बाईट दिली...त्याची नंतर हकालपट्टी झाली,हा भाग वेगळा...
२. केदारनाथमधील शिवाचे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते,या मंदिरात एबीपीचा रिपोर्टर चप्पल घालून गेला...त्यामुळे भावना दु:खावल्या गेल्या.
३. कव्हरेजसाठी गेलेली झी २४ तास एक रिपोर्टर हलकट जवानी गाणे

लावून, टर्र उडवत आहे...तिच्या बाबतीत न लिहिले बरे...
असे अनेक किस्से आपणास पहावयास मिळाले...भारतीय सैनिक पीडित लोकांना वाचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत असताना काही जवानही शहीद झाले...पण सैनिकांनी आपले मनोधैर्य खचू दिले नाही...
मात्र काही रिपोर्टरनी मीडियाची लाज घातली आहे....त्याचा निषेध आणि धिक्कार...




आणखी एक किस्सा पहा...

झी 24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर यांचा नौटंकीपणा कसा आहे,ते या व्हिडीओमध्ये दिसेल. 
( कशाला एवढी चमकोगिरी करावी लागते देव जाणे ....)