रवी आंबेकर मी मराठीचे संपादक

मुंबई - मी मराठी चॅनलवर येत्या काही दिवसांत २४ तास बातम्या सुरू होणार आहेत.या न्यूज चॅनलचे एडिटर हेड म्हणून रवी आंबेकर यांची निवड करण्यात आली असून,आंबेकर हे येत्या १ सप्टेंबर रोजी या चॅनलचे एडिटर इन चिफ म्हणून सुत्रे हाती घेण्यात येणार आहे.या चॅनलमध्ये लवकरच आणखी काही बडे पत्रकार जॉईन होणार आहेत.त्यामुळे इलेट्रॉनिक मीडियात मोठ्या उलथा-पालथी होणार आहेत.
मी मराठी या चॅनलची मालकी पुर्वी कांचन अधिकारी यांच्याकडे होती.एक वर्षापुर्वी महेश मोतेवार यांच्याकडे आली.त्यानंतर मी मराठीवर २४ तास बातम्या सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू होती.जेव्हा २४ तास बातम्या देण्याचे फिक्स झाले,तेव्हा बेरक्याने एक महिन्यापुर्वी तसे वृत्त दिले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अखेर मी मराठी लवकरच २४ तास बातम्या सुरू करणार आहे.रवी आंबेकर यांची एडिटर इन चिफ म्हणून निवड करण्यात आली आहे.आंबेकर अनेक वर्षे आय.बी.एन.७ चे मुंबई ब्युरो चिफ होते.काही महिन्यापुर्वी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये गेले होते.मात्र केवळ चार महिन्यातच त्यांनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र केला आहे.
आंबेकरांनी जय महाराष्ट्र सोडल्यानंतर ते न्यूज एक्स्प्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती,मात्र बेरक्या वार्ताहराने त्यांच्याशी संपर्क साधला असता,त्यात तथ्य नसल्याचे सांगितले होते.त्यानंतर ते मी मराठीत जाणार असल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त होती,मात्र अधिकृतरित्या त्यांनी जाहीर केल्यानंतर हे वृत्त देण्यात येत आहे.
 
जय महाराष्ट्रला गळती लागणार
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा अवघ्या चार महिन्यात फुगा फुटला आहे.मंदार फणसे,तुळशीदास भोईटे आणि रवी आंबेकर हे त्रिमुर्ती काही तरी कमाल करेल,अश्या सर्वांच्या अपेक्षा होत्या.मात्र आंबेकरांनी जय महाराष्ट्र सोडल्यामुळे आता या चॅनलला पहिला धक्का बसला आहे.आता आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.त्यानंतर या चॅनलला मोठी गळती लागणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सुमार दर्जाच्या बातम्या आणि वितरणामध्ये असलेली बोंबाबोंब यामुळे जय महाराष्ट्रला अंद्याप टीआरपी काहीच नाही.संपादकीय टीममध्ये बेबनाव,व्यवस्थापकांची लुडबुड यामुळे वातावरणही बिघडले आहे.मालक सुधाकर शेट्टी करोडो खर्च करीत आहेत,मात्र काहीजण वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत.अनेकांना  अजून पगारी मिळल्या नाहीत.अनेक ठिकाणी ब्युरो ऑफीस सुरू झालेले नाहीत.जेथे सुरू झाले,तेथे यंत्रणा सुरू नाही.त्यामुळे बातम्या लेट लागत आहेत.बातम्याचे सादरीकरणही सुमार दर्जाचे आहे.भोर्इंटेंना टी.व्ही.९ तर फणसेंना आय.बी.एन.-लोकमत टाईप बातम्या हव्या आहेत.संपादकीय टीममध्ये ताळमेळ नाही.जे वर्षभरापासून काम करीत होते,त्यांना तुटपुंजे वेतन आणि नव्याना भरघोस वेतन,ही दरीही हानीकारक ठरली आहे.जय महाराष्ट्रच्या मालकाकडे प्रचंड पैसा आहे,मात्र चॅनलला टीआरपी मिळत नसल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हे चॅनल घाश्या गुंडाळू शकते.त्यामुळे जय महाराष्ट्रमध्ये आतापासून चलबिचल सुरू झाली आहे.