गांवकरीची नवी मुंबई आवृत्ती बंद

मुंबई - गांवकरीने सानपाड्यातील प्रिंटीग युनिट  काही दिवसांपुर्वी बंद केले होते.आता संपादकीय विभागही बंद केला आहे. त्यामुळे अनेक कामगार ,डी.पी.पी.करणारे कर्मचारी आणि उपसंपादक बेकार झाले आहेत.
संतापाची बाब म्हणजे त्यांचा गेल्या सात महिन्यापासून पगार थकलेला आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारी बुडवून तसेच युनिटच बंद करून पोतनीसांनी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

पोतनीस साहेब,हे वागणं बरं नव्हं...