दिलीप तिवारी यांच्या विषयी लोकमतचा खुलासा आणि तिवारी याचं निवेदन



दिलगिरी व्यक्त करायची लाज का वाटली ???
मित्राहो !
काल लोकमतने प्रसिध्द केलेल्या एका बातमीत माझा नामोल्लेख होता. त्याविषयी मी तीव्र आक्षेप घेतल्यावर संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी वरील खुलासा प्रसिध्द केला आहे. माझे व्यक्तिगत या खुलाशाने समाधान नाही. माझा मुद्दा आहे की, संघटना किंवा झुंडशाही करून कोणी काहीही निवेदन कलेक्टर, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना दिले तर छापणार का ? मला अटक व्हावी, मला हद्दपार करावे असे कोणते कृत्य मी केले ? ते सिध्द झाले आहे का ? मिलिंद कुळकर्णीकडे त्याची माहिती आहे का ? या प्रश्नांची उत्तरे न शोधता संपादक जेव्हा उथळपणे जबाबदारी निभावतो आणि त्याला आपण केलेल्या कृत्याची दिलगिरी व्यक्त करायची लाज वाटते तेव्हा त्या माध्यमाचे पतन होते असे मी एमसीजे अभ्यासक्रमात शिकलो. मला तेथे गोल्डमेडल मिळाले आहे. आणि हो, मी तो अभ्यासक्रम उमवीतून केला आहे. मिलिंद कुळकर्णीचा खुलासाही हा असाच आहे. मी हा विषय लोकमत व्यवस्थापना पर्यंत पोहचवला असून मी सुध्दा संधी मिळेल तेव्हा निनावी पत्राचा आधार घेवून संबंधित संपादकाविषयी बातमी छापणार आहे. नंतर वरील भाषेत खुलासा करुन दिलगिरी व्यक्त करायचा विचार करु...
(टीप - काल निवेदन न घेता मिलिंद कुळकर्णी लोकमतच्या शहर कार्यालयातून निघून गेल्यानंतर मी श्री चोपडासाहेब (जळगाव), श्री हेमंत कुळकर्णी (नाशिक), विजय बाविस्कर (औरंगाबाद), श्री रूषीबाबू दर्डा यांना सर्व प्रकिर कळवला आहे)

Dainik Lokmat