आता आपण फक्त लढ म्हणा...


आय.टी.अ‍ॅक्ट ६६ अ रद्द झाल्यामुळं बेरक्याच्या लेखणीला आणखी धार येणार आहे.आमचा गेल्या चार वर्षापासून जो लढा सुरू आहे,तो अधिक यशस्वी होणार आहे.आता आपण फक्त लढ म्हणा...
जगाला शहाणपण शिकवणारे आणि उपदेशाचे डोस पाजणारे तथाकथित पत्रपंडित प्रत्यक्षात कसे आहेत,हे सांगण्याचे धाडस फक्त बेरक्याने केले आहे.त्याचा बुरखा टराटरा फाडला आहे.आता हे काम अधिक धाडसाने होणार आहे.
बेरक्या कोणाला घाबरत नाही,किंवा घाबरला नाही.परंतु पोलीसांना हाताशी धरून किंवा त्यांच्यावर दबाब आणून बेरक्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला.पोलीस दबाबावला बळी पडून आय.टी.अ‍ॅक्टचा दुरूपयोग करतील,अशी नकळत कुठे तरी किंचित भीती होती.आम्हाला जेलमध्ये जाण्याची भीती नव्हती,पण बेरक्या ब्लॉग पोलीस बंद करतील,अशी भीती होती.त्याचबरोबर बेरक्याला माहिती देणारेही यामुळं घाबरत होते.
आता घाबरण्याचे कारण नाही.आता बिनधास्त माहिती कळवा.आपले नाव नेहमीप्रमाणे गुप्त ठेवले जाईल.
चला मीडियातील घाण साफ करू या....
चांगल्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या...
बेरक्या सदैव आपल्या पाठीशी आणि सोबत आहे...

- बेरक्या उर्फ नारद