शास्तेंच्या वाड्यावरून

आघाडीच्या मराठी पेपरांची सध्या पीछे हाट सुरु आहे आणि ती कशामुळे हे काही केल्या कळत नाही. मालक परेशान म्हणून संपादक देखील चेहऱ्यावर वैचारिक टेन्शन दाखवण्याचा अभिनय करण्यात एव्हाना तरबेज झालेच आहेत. काही तरी बदल केला पाहिजे असे रोज म्हणायचे
आणि रोज बैठका, जोर बैठका घेवून घाण पेपर काढायचा असे सुरु आहे.
थोडक्यात मालक अन संपादक मिळून आपापले पेपर बुडवताहेत… आपल्याला काय शेठजींच्या कुरणात अनेक बैल चरून गेले, आजदेखील चरत आहेत… त्यात आपण देखील अंमळ पुढे सरकून चरून घ्यावं…
हेकु सुपारी कातरत सांगत होते.त्यांची सुपारी एकदाची फुटली असे म्हणतात. पाच सहा महिन्यात ते समूह संपादक होतील. मुंबईचेच संपादक व्हायचे होते तर थेट समूहाची सुपारी फुटली ….
नाशिक क्षेत्र तसे दहावे तेरावे घालण्यासाठी प्रसिद्ध.तेरावे घालणारे हेकु समूहाला कुठला अभिषेक घडवतात याचा अंदाज नाही. पण त्यांच्या अडकित्त्यात एकाचवेळी अनेक सुपार्या असतात. समूह सम्पादक पदाची सुपारी तर त्यांनी फोडलीच आणि आणखी एक सुपारी कातरली ती अशी- तसे हे सिक्रेट ऑफ स्माल थिंग्ज म्हणा.…
पुण्याला जाते म्हणून ऑफिसातली साहित्य अकादमी फेम अल्टो संध्याकाळी निघाली आणि नाशकातल्याच ताजला जावून थांबली. अगदी पहाटेपर्यंत. ताजला म्हणे मालक होते मोठे मुक्vकामाला. सुपारी कातरून झाली तसे सांगून झाले हेकुंचे.त्यांच्या दुधात जितके पाणी असायचे तितकेच लिखाणात, पण सुपारी हेच हेकुंचे बलस्थान. आता हेच बघा ना, सुपारी कातरत ताज उभा करतांना एकाच अडकित्त्यात किती सुपार्या वाजवल्या हेकुंनी. मालकाची अन आल्टोची पण…