नवजागृतीच्या लढ्याची अखेर एबीपी माझाकडून दखल....

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा देत असलेल्या नवजागृती वृत्तवाहिनीच्या कर्मचा-यांकडे माध्यमांमधून वेळोवेळी दूर्लक्ष्य करण्यात येत होते. पत्रकारांचा मित्र असलेल्या बेरक्याने मात्र नवजागृतीच्या कर्मचा-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना मदतच केली. 
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या माध्यमकर्मींच्या पाठीशी माध्यमं नसल्याचं चित्रयानिमित्त दिसून आलं..जागृती ग्रुपचे मालक राज गायकवाड याला बीदर पोलिसांनी अटक केल्यानंतर मात्र अचानक माध्यमांमध्ये 'नवजागृती' झाली आणि 'ही' न्यूज छापण्याची तसदी काही वृत्तपत्रांनी घेतली. 
महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी असंलेल्या एबीपी माझाने आज येरवडा पोलिस चौकीत येऊन नवजागृतीच्या कर्मचा-यांच्या व्यथा ऐकून घेतल्या...माध्यमात शिरलेल्या अपप्रवृत्तीला वेळीच ठेचून काढण्याची गरज असल्याची भावना कर्मचा-यांनी यावेळी व्यक्त केली...