लातूरच्या पांडू हवालदारची अखेर हकालपट्टी

लातूर - चार ओळीची बातमीही लिहिता न येणा-या पांडू हवालदारची पुरोगामी विचारसरणीच्या दैनिकातून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे.ज्या देशमुखांनी या पांडू हवालदारला मोठे गेले होते,त्याच देशमुखांनी त्यांच्या ढुंगणावर लाथ मारत गढीच्या बाहेर लावले.काळाचा महिमा अगाध असतो,हेच खरे आहे.
१९९१ ला सुरू झालेल्या या दैनिकात पांडू हवालदार उपसंपादक म्हणून जॉईन झाला होता.जेव्हा या दैनिकात आला तेव्हा त्याला चार ओळीची बातमीही नीट लिहिता येत नव्हती.त्यावेळी त्याच्याकडे सायकलही नव्हती.नंतर बंगला,गाडी आणि वृत्तसंपादकपद आले.या दैनिकांत अनेकजण आले आणि गेले परंतु खप काही वाढला नाही.देशमुखांचे मुखपत्र अशीच या दैनिकाची ओळख राहिली.साहेब अचानक गेले आणि या देनिकाचा आधारवड कोसळला,त्यामुळे आर्थिक घरघर सुरू झाली.एक ज्येष्ठ संपादक गेल्यानंतर या दैनिकाच्या संपादकपदी पांडू हवालदारची नाईलाज म्हणून निवड करण्यात आली.संपादक झाले तरी या पांडू हवालदारच्या पत्रकारितेत काही सुधारणा नव्हती,संगणकाचे कसलेही ज्ञान नाही.कागदावर बातमी लिहिण्याची जुनी सवय.एक बातमी लिहिण्यासाठी दहा कागद फाडून कच-याच्या टोपलीत टाकणारा पांडू हवालदार आर्थिक घोटाळ्यात सापडला आणि छोट्या देशमुखांनी त्याची परवा हकालपट्टी केली.लायकी नसताना,पांडू हवालदार मोठा झाला होता.तेही केवळ जात फॅक्टरमुळे.परंतु त्याच पांडू हवालदाराची अखेर हकालपट्टी करण्यात आली.काळाचा महिमा अगाध आहे,हेच खरे.पांडु हवालदाराच्या जागेत, याच दैनिकातून पुढारीत दोन वेळा आणि या दैनिकात दोन वेळा काम करणा-या मंगेशाची निवड करण्यात आली आहे.आता पुरोगामी दैनिकाच्या मागे मंगेश उभा आहे.हा मंगेश आता काय दिवे लावतो,याकडे लातूरकरांचे लक्ष वेधलय.