यवतमाळच्या
शिक्षण संस्थेत जे काही घडलं , त्याबद्दल श्री विजय दर्डा यांचं निवेदन वाचनात आलं
त्या
निवेदनात व्यक्त करण्यात आलेल्या श्री विजय दर्डा यांच्या मतांशी मी पूर्णपणे सहमत
आहे .
आपल्या
संस्थेतील एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्यानं अशा घृणित पद्धतीनं वागावं असं विजय किंवा/आणि
राजेंद्र दर्डा कधीही कधीही सांगणार नाहीत , याची मला पूर्ण खात्री आहे ;
त्यांच्या स्वप्नातही तसा काही ओंगळ-अघोरी विचार तरळेल यावर माझा मुळीच विश्वास
नाही .
गेली तीन
साडेतीन दशकं या श्री विजय आणि श्री राजेंद्र दोघां दर्डा बंधुंना मी बघतो आणि ओळखतो
आहे ; या दोन्ही भावांच्या ( त्यातही विशेषत: विजय दर्डा यांचा जास्त ! ) विनयशील
आणि सुसंस्कृत वागण्याचा ( आणि प्रेमळ तसंच अकृत्रिम आतिथ्याचाही ) अनुभव मला
अनेकदा आलेला आहे .
श्री विजय
दर्डा त्यांच्या निवेदनात म्हणतात त्याप्रमाणं , राजकारण आणि मीडियात असल्यानं
अनेक शत्रू निर्माण होतात पण, एवढी मोठ्ठीठ्ठी प्रतिक्रिया का उमटली याची कारणं
काही एवढीच नसतात . पत्रकारितेत आम्ही आणि दर्डा यांच्या तुलनेत आमच्यासारख्या
अनेक लहानांनी मोठ्ठाले पंगे घेतले पण , जनमानस आमच्याविरुद्ध एवढं संघटीत आणि कधीच उग्र झालं नाही .
श्री विजय
आणि श्री राजेंद्र दर्डा यांच्या विनयशील आणि सुसंस्कृतपणाचा वारसा त्यांच्या
पुढच्या पिढीतील सर्वजण आणि संस्थातील त्यांचे सहकारी चालवत आहेत का , हे बहुदा या
दर्डा बंधुंनी तपासून पाहिल्याचं दिसत नाहीये ; ‘लोकमत’च्या नावाखाली चालणारी दादागिरी आणि
लूट रोखण्याचा प्रयत्न झाले असते तर असं कारस्थान रचलं गेलं नसतं असं म्हणायला खूप
वाव आहे .
आपण
यवतमाळचं अति ‘दर्डाकरण’ करतो आहोत याचे पडसाद , भविष्यात कधी-नं-कधी उमटणार आहेतच
याचा अंदाज कायम सावध असणाऱ्या चाणाक्ष दर्डा यांनी का आला आणि त्यांनी तो बांधला
नाही , हे एक कोडंच आहे .
श्री राजेंद्र
दर्डा यांचा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला , तेव्हाच दर्डा यांच्या संदर्भात कधी तरी तीव्र टोकाची प्रतिक्रिया
उमटू शकते याचे संकेत मिळालेले होते ; ते या दोघां दर्डा बंधुंना त्या
पराभवानंतरही जाणवले नाहीत हे एक आश्चर्यच आहे ! आणखी एक म्हणजे- त्या निवडणुकीत
खुद्द ‘लोकमत’शी संबधित अनेकांनी राजेंद्र दर्डा यांना मतदान केलेलं नव्हतं ; असं
का घडलं याबद्दल आत्मपरीक्षण करण्यात आलं की नाही हे मला ठाऊक नाही !
बहुसंख्येनं
खुजी उंची आणि किरटी वृत्ती असलेल्या खुशमस्कऱ्या आणि सुमारांचं नेतृत्व करण्यातून
मिळणारा आनंद म्हणा की नशा , ही एक सूज असते आणि ती सूज केव्हा-न-केव्हा ठणकतेच ;
याचं भान सुटल्यामुळे तर हा ‘लोच्या’ झाला नाहीये नं, याचा विचार बहुदा यवतमाळकरांच्या
न्यायबुद्धीला आवाहन करतांना विजय दर्डा यांनी केलेला नाहीये असंच हे निवेदन
वाचल्यावर जाणवलं .
शिक्षण
संस्था चालक म्हणून दर्डा यांचं म्हणणं कितीही समर्थनीय असलं तरी एका मोठ्या
वृत्तपत्र समुहाचे मालक-संपादक म्हणून ते चुकले आहेत कारण यापूर्वी लैंगिक शोषणाच्या ( आणि अशा अनेक एकारल्या ) बातम्या
प्रकाशित करतांना संस्था चालकांचे राजीनामे लोकमत वृत्त समुहाने आक्रमक मोहिमा
राबवत मागितले , त्यांना अटक का केली जात नाही ही मागणी लावून धरली , त्यावेळी ‘त्यात
संस्था चालकाचा दोष नाही’, असं दर्डा यांनी त्यांच्या ‘माणसां’ना समजवलं नाही .
त्यावेळी आततायीपणाचं जे रोपटं ‘लोकमत’नं पत्रकारितेत लावलं त्याला आज आलेलं ‘हे’
फळ आहे !
यवतमाळच्या
बातम्या प्रकाशित न करून तर दर्डा यांनी चुकीचा पायंडाच पाडला नाही तर , त्यांच्याभोवती
असणारं संशयाचं धुकं गडद केलं आणि यवतमाळकरांना आणखी उग्र होण्यास सहाय्यच केलं .
पहिल्या
दिवसापासूनच लोकमत वृत्तपत्र समूहाच्या सर्व वृत्तपत्रात ‘हार्ड न्यूज’ आणि
स्वत:चं निवेदन प्रकाशित केलं असतं तर विजय दर्डा यांना अशी बदनामी सहन करावी
लागली नसती .
my dear vijaybabu , you have committed unmatchable late in this regard ,!
अंतुले यांच्या सिमेंट घोटाळयाबद्दल ‘पुलं’नी
म्हटलेल्या शीर्षकाचा आधार घेऊन म्हणायचं तर, काही म्हणा, दर्डाजी तुम्हारा इसबार
चुक्याच...
// इति दर्डा पुराण समाप्त //
-प्रवीण बर्दापूरकर,
9822055799 / 9011557099
9822055799 / 9011557099