पुढारीतून शेठजीची हकालपट्टी

उस्मानाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूस लाखो रूपयास चुना लावून पुढारीच्या दारात गेलेल्या शेठजीची पुढारीतूनही  हकालपट्टी करण्यात आली आहे.जिल्हा प्रतिनिधी म्हणून भिमाशंकर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहेे.
हा शेठजी स्वतः स्मार्ट मित्रचे काम करतो आणि भावाच्या नावावर पुढारीचे काम करत होता.महाराष्ट्राच्या मानबिंदूस लाखो रूपयाची टोपी घातल्यामुळे या शेठजीची हकालपट्टी करण्यात आली होती.त्या जागेवर विशाल सोनटक्के येताच,या शेठजीने सोनटक्केविरूध्द अनेक खोट्या तक्रारी बाबूजीकडे  केल्या होत्या,परंतु छोट्या बाबूजीनी त्यास भिक घातले नाही.नंतर या शेठजीने स्वतःचे दुुकान चालवण्यासाठी पुढारीचा आसरा घेतला होता.परंतु पद्श्रींनाही या शेठजीच्या करामती समजल्याने पुढारीतूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.
औरंगाबादहून लवकरच पुढारी सुरू होणार आहे.जिल्हा प्रतिनिधी म्हणून भिमाशंकर वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.वाघमारे यांनी यापुर्वी अनेक वर्षे सकाळमध्ये काम केले आहे.योग्य व्यक्तीची पुढारीसाठी निवड झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले आहे.हा शेठजी आता वाघमारेविरूध्द खोट्या तक्रारी करू शकतो,अशी चर्चा सुरू आहे.
दिवाळीमध्ये पत्रकारांसाठी अनेक कारखान्याकडून आलेली साखर लाटणे तसेच लोकमंगलकडून आलेले तुपाचे डबे लाटणार्‍या शेटजीची स्मार्ट मित्रमध्येही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.तुळजापूरच्या एका आमदाराकडून जाहिरातील लाख रूपये घेवून ती जाहिरातच न छापणार्‍या आणि पैसे लाटणार्‍या शेठजी आणि आमदाराच्या पी.ए.मध्ये मागे चांगलीच हामरीतुमरी झाली होती,त्याची अजूनही चवीने चर्चा सुरू आहे.