जय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना अच्छे दिन कधी येणार ?


मुंबई - जय महाराष्ट्र  चॅनेलच्या  मालकांचे  शेंडीफळ सुहान शेट्टी आता रोज चॅनेलमध्ये येऊन बसू लागलेय्..प्रत्येक डीपार्टमेंटसोबत मिटींग्स  सुरू झाल्यात. खरे-जोशी-भागवत यांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या चॅनलला नवी दिशा मिळवून दिली. घोटाळे बाहेर काढून राजकीय वर्तुळात चॅनलची चांगलीच हवा आहे. पण जंगल मे मोर नाचा किसने देखा , अशी गत  झाली आहे.
चॅनलमध्ये दिवस सुरू होतो तोच ,ही बातमी लवकर पुढच्या बुलेटीनला ब्रेक करा, मोठी करा, बातमी चांगली खेळा, अशी जबरदस्ती केली जाते. दर तासाला प्रत्येक बातमी ब्रेकींग करता करता आधीच मेताकुटीस आलेल्या  कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. काही मर्जीतले खिलाडी सोडले तर न्यूजरूममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर ब्रेकींग न्यूजची तलवार असते...लेट का झाला २ लाईनमध्ये तरी उतरवा बातमी...असा सगळा माहौल असतो.
AC बंद होता म्हणून गरमीनं होरपळलेला स्टाफ दर महिन्यात उशिरा होणाऱ्या पगारामुळे त्रस्त झाला आहे .. वरिष्ठांच्या अपेक्षा तर एवढ्या पण जरा कुठे वर खाली झालं तर न्यूजरूममध्ये सगळयांसमोर पाणउतारा केला जातो. तुटपुंज्या पगारावर काम  करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी होणार, याकडे लक्ष वेधले आहे.