प्रहारचे बारा वाजले !

नारायण राणे यांच्या मालकीच्या प्रहारला  उतरती कळा लागली आहे..मधुकर भावे यांच्या काळात तर अधिकच अवकळा आली आहे. लॉन्चिंगच्या वेळी मुंबईत  संपादकीय विभाग आणि रिपोर्टर मिळून किमान १०० जण होते, ते आता बारावर आले आहेत. ३ रिपोर्टर, १ चीफ रिपोर्टर, २ सब  एडिटर आणि ५ डिझाइनर (यातील एकजण  राजीनामा दिला असून नोटीस वर आहे ) आणि स्वतः संपादक असे बाराजण काम करत आहेत.या सर्वांचा चार महिन्यापासून पगार थकला आहे, तसेच  मागील दोन वर्षांपासून प्रॉव्हिडंट फंडा चे पैसे देखील भरलेले नाहीत.मध्यन्तरी काही कर्मचारी नारायण राणे यांना भेटले असता आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही.प्रहारचा खपही दिवसेंदिवस घसरत चालला आहे. इतके मात्र खरे की,  प्रहार सध्याच्या स्पर्धेत हार पत्करला आहे...