वृत्तपत्रांच्या न्यूजवॉरमध्ये संपादक, पत्रकार घायाळ

औरंगाबाद : सध्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये बातम्यांची स्पर्धा लागली आहे. प्रतिस्पर्धी दैनिकांत लागलेल्या किती बातम्या आपल्याकडे नाहीत, यावरून व्यवस्थापन धारेवर धरत असल्याने संपादक आणि पत्रकार पार मेटाकुटीला आले आहेत. विशेष म्हणजे बातमीचा ब माहीत नसलेल्या व्यवस्थापनाकडून दुसऱ्यांच्या शोध बातम्याही मिसिंगमध्ये पकडल्या जात आहेत, त्यामुळे तर हसावे की रडावे, अशी अवस्था अनेक संपादकांची झाली आहे. विशेष करून गुन्हेविषयक बातम्यांकडे फारच गांभीर्याने लक्ष दिले जात आहे, यातून मग किरकोळ बातम्यांनाही प्राधान्याने घेतले जात आहे.
लोकमत, पुण्यनगरी, सकाळ, दिव्य मराठी आणि पुढारी यांच्यात विशेष करून बातम्यांची स्पर्धा लागली आहे. पुढारीचे आगमन झाल्यानंतर स्थानिक बातम्यांना अग्रक्रम देण्याचे धोरण सर्वच दैनिकांनी ठरवले असून, यात रात्रीची डेडलाइनही अनेक दैनिकांनी पुढे ढकलली आहे. ज्या दैनिकाचे मालक औरंगाबादेतच राहतात, त्यांनी तर संपादकांचा पार छळ मांडल्याचे चित्र आहे. ही बातमीच का आली नाही, याचे लेखी खुलासे करावे लागत असल्याने कशा कशाचे उत्तर द्यावे आणि रोज रोज काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांना पडतो. किरकोळातील किरकोळ बातमी मिqसगमध्ये पकडली जात असल्याने ती आपल्याकडेच का आली नाही, हे सांगताना संपादकांना आतापर्यंतच्या अनुभवाचा कस लागताना दिसतो.
क्राईम रिपोर्ट्र्सना आले महत्त्व
दैनिकांतील न्यूज वॉरमध्ये क्राईम रिपोर्ट्र्सना विशेष महत्त्व आले आहे. या बिटमध्ये आपली छाप सोडणाèया पत्रकारांत लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, सामनाच्या क्राईम रिपोर्ट्र्सचा समावेश होतो. त्यामुळे अन्य दैनिकांच्या क्राईम रिपोर्ट्र्सची दमछाक होत आहे. पुढारीच्या धोरणामुळे ते विशेष सक्रीय झाले आहेत. रात्री बारा ते एक पर्यंत सर्वच क्राईम रिपोर्ट्र्सना जागे राहू बातमी मिस होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागत आहे.