निलेश खरे टीव्ही 9 मध्ये जॉईन

मुंबई - बेरक्याचे भाकीत पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले आहे.जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या निलेश खरे यांनी अखेर टीव्ही  9 जॉईन केले आहे.
पुर्वीचे स्टार माझा आणि आताचे एबीपी माझामध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर निलेश खरे अडीच वर्षापुर्वी बाहेर पडले.त्यानंतर  मी मराठी करून  जय महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत होते.आता त्यांनी जय महाराष्ट्र चॅनलला जय महाराष्ट्र करून टीव्ही 9 मध्ये संपादक म्हणून जॉईन झाले आहेत.
टीव्ही मध्ये ढोकळा आणि बेदमची मनमानी सुरू होती.या दोघांमुळे अनेकजण जॉब सोडून गेले होते.यासंदर्भात बेरक्याने वारंवार बातम्या प्रकाशित केल्या होत्या.त्यानंतर संपादक असलेल्या रेड्डीची विकेट पडली.त्यानंतर सल्लागार संपादक म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे जॉईन झाले होते.त्यांच्याकडे फक्त सडेतोड या डिबेट शोची जबाबदारी आहे.मात्र चॅनल हेड आणि संपादक म्हणून निलेश खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वागळे आणि खरे यांंना घेवून चॅनलची प्रतिमा सुधारण्याचा हैद्राबादी मालकाचा प्रयत्न सुरू आहे.
दुसरीकडे खरे आल्यामुळे ढोकळा आणि बेदम यांची चुळबूळ वाढली आहे.ढोकळाने दुसरीकडे जॉब शोधनेही सुरू केले आहे.ढोकळा साममध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.बेदमनेही जॉब सर्चिंग सुरू केले आहे.
खरे आल्यामुळे चॅनलमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे.ढोकळामुळे काही रिपोर्टरनी जोरदार वसुली सुरू केली होती.आता त्याला चाप बसण्याची शक्यता आहे.