महाराष्ट्र्र १ चे कर्मचारी हवालदिल

मुंबई - महाराष्ट्र १ च्या कर्मचाऱ्याच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारी  नाहीत, त्यामुळे अनेक कर्मचारी रजा टाकून घरी बसले आहेत तर काहींनी दुसरीकडे जॉब शोधणे सुरु केले आहे. चॅनेल आर्थिक घाबघाईस आल्यामुळे या चॅनलच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
निखिल वागळे  गेल्यापासून चॅनेलचा टीआरपी पार घसरलाय, त्यात पगारी वेळेवर होत नसल्यामुळे गळती सुरु आहे. अनेक बिनीचे कर्मचारी सोडून गेल्यानंतर उरले -सुरले कर्मचारीही गेले तीन महिने पगार नसल्यामुळे हवालदिल झालेत. रचना विचारे, अजय परचुरे, दर्शना तांबोळी सह अनेक कर्मचाऱ्यांनी याच कारणामुळे रजा टाकून घरी बसने पसंद केले आहे, पंकज इंगोले यांनी पुन्हा राजीनामा दिलाय. सध्या चॅनेलमध्ये व्हिडीओ एडिटरच नाहीत, नवे यायला तयार नाहीत आणि जुने सोडून जात असल्यामुळे चॅनेलला उतरती कळा  सुरु झाली आहे. चॅनेलचे तीन पार्टनर आहेत. तीन तिघाडी आणि काम बिघाडी सुरु आहे. हे तिन्ही पार्टनरनी स्वतःची आर्थिक गुंतवणूक काढने सुरु केल्यामुळं चॅनल आर्थिक डबघाईस आले आहे.

जाता -जाता
एका न्यूज एडिटरला न्यूजची काडीचीही अक्कल नसताना त्याला या पदावर बसवण्यात आले आहे. तसंच एका ज्युनिअरला सिनियरवर बॉसगिरी करण्याचे काम देण्यात आलंय . न्यूज एडिटर  नव्या प्रशिक्षणार्थीबरोबर टीपी करत बसलेला असतो. आता तर म्हणे ज्युनिअर आणि न्यूज एडिटर यांच्यात चांगलेच बंड सुरु झालंय...