संजय राऊत यांचे 'वंदे मातरम्' राष्ट्रगीताबाबत अज्ञान !


काल दि. २९ ऑक्टोबर चा  दैनिक सामना आपण वाचला का ? वाचला नसाल तर नक्की वाचा. त्यातील  उत्सव  पुरवणी पाहा ... या पुरवणीत कार्यकारी संपादक संजय राऊत  यांचे  'रोखठोक' सदर  नेहमीप्रमाणे प्रसिद्ध झाले आहे. राऊत यांनी कालच्या  'रोखठोक'मध्ये  रवींद्रनाथ टागोर यांच्यावर एक लेख  लिहिला आहे. 'टागोर आज हवे होते' असे या लेखाचे शीर्षक आहे.
या लेखात राऊत यांनी 'वंदे मातरम्'  या राष्ट्रगीताचा उल्लेख केला आहे. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिल्याचे म्हटले आहे. तसेच या  राष्ट्रगीतावरून कसे राजकारण सुरु केले आहे, यावर भाष्य केले आहे.
मात्र वस्तुस्थिती अशी आहे की , 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत   बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये आनंदमठ या कादंबरीमध्ये लिहिले आहे. आणि  ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.
तर रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्र्गीत लिहिले आहे.
(संदर्भ पाहा )
मात्र संजय राऊत यांनी 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर  यांनी लिहिल्याचा जावईशोध लावला आहे. स्वतःला विद्वान समजणाऱ्या संजय राऊत यांचे  अज्ञान पुन्हा उघडे पडले आहे.

काही  दिवसापूर्वी संजय राऊत यांनी  छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल वादग्रस्त  लिखाण केले होते. तेंव्हा  मराठा  समाजाच्या कार्यकर्त्यानी राऊत यांचे प्रतीकात्मक पुतळा जाळून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला होता.