लोकमत कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली नव्हती, त्यामुळे प्रचंड नाराजी वाढली होती. एक तर मजिठिया आयोग लागू नाही आणि त्यात पगारवाढ नसल्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले होते. दिल्ली आवृत्तीची तयारी सुरु असताना अनेक कर्मचारी दुसऱ्या पेपरमध्ये निघून जात होते तर नवीन कर्मचारी  लवकर येत नव्हते, त्यामुळे लोकमत प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले.
 खरं तर  जून महिन्यामध्ये मध्ये पगारवाढ होते, पण यंदा देण्यात आली नव्हती. याबाबत बेरक्याने अनेकवेळा वृत्त दिले होते. त्याची दाखल लोकमत प्रशासनाला घ्यावी लागली.येत्या महिनाभरात लोकमत आपल्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचा संबंधित फॉर्म भरणे सध्या सुरु आहे.किमान १० ते १२ टक्के पगारवाढ होणार असल्याचे कळते.
दिल्ली आवृत्ती १५ डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे.एकूण १६ पाने असणार आहेत. पैकी १२ पाने महाराष्ट्रात लागणार आहेत. ६ पाने औरंगाबाद आणि ६ पाने नागपूर असे नियोजन आहे. त्यामुळे लोकमत कर्मचाऱ्यावर आणखी ताण वाढणार आहे. लोकमतने येत्या महिनाभरत पगारवाढ नाही दिली तर लोकमतला गळती लागण्याची शक्यता आहे.