तरुण भारतमध्ये 'जाणता राजा'ची जबरदस्तीने तिकिट विक्री

बेळगावच्या तरुण भारतमध्ये कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने 'जाणता राजा' या नाटकाची तिकिटे विक्रीस भाग पाडण्यात येत आहे. हे नाटक पेपरच्या तरुण भारत ट्रस्टकडून आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्याने किमान एक हजाराची तिकीट विक्री करावी असा फतवा सीईओ दीपक प्रभू यांनी काढलाय. नाटकाच्या तिकिटांची विक्री न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या गळ्यात मारण्यात येत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. स्थायिकांना तिकीट विक्री करणे सोपे आहे, मात्र बाहेरच्यांना हे अवघड आहे. पगारवाढ करताना मात्र महागाई असल्याचे कारण सांगत आहेत. गेल्या एका वर्षांपासून होणारी पगारवाढ अजूनही रखडलीय. मालक किरण ठाकुर पेपरवर लक्ष देण्याऐवजी लोकमान्य या आपल्या बँकेचा विस्तार करत आहे, तर मुलगा प्रसाद ठाकुर नेहमी विदेशात असतो. पेपरमध्ये कोणाचेही लक्ष्य नसल्याने कर्मचारी कंपनी सोडून जात आहेत. प्रभू यांनी सर्व अधिकार आपल्याकडे ठेवलेत. संपादक जयवंत मंत्री यांच्यावर भर मीटिंगमध्ये रागाने बोलत अपमान केला जातो.