तीन चॅनल , तीन अँकर , तीन बदल

मुंबई - मिलिंद भागवत, विलास बडे पाठोपाठ आता एबीपी माझातून रेश्मा साळुंखे ही अँकर न्यूज १८ लोकमतमध्ये जॉईन झाली आहे. जेव्हा भागवत आणि बडे यांनी एबीपी माझाला सोडचिठ्ठी देवून न्यूज १८ लोकमत जॉईन केले होते, तेव्हाच  नम्रता वागळे आणि  रेश्मा साळुंखे यांना ऑफर होती, पण नम्रताने 'नम्र' नकार दिला तर रेश्माने नको, होय करत आता एबीपी माझाला बाय बाय करत न्यूज १८ लोकमत मध्ये जाणे पसंद केले आहे.
न्यूज १८ लोकमत मध्ये जुन्या आणि नव्या अँकर मध्ये लॉबिंग सुरु झालं आहे. एबीपी माझातून आलेले विलास बडे हे संपाद्क डॉ. उदय निरगुडकर यांचे लाडके बनले आहेत. त्यांच्या शिफारशीनुसारच रेश्मा साळुंखे यांना एबीपी माझापेक्षा पॅकेज वाढवून घेण्यात आले.बडेनी आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली आहे, मात्र जुने आणि नवे असा वाद पेटला आहे. जुन्याचे पगार वाढत नाहीत आणि नव्यानं पॅकेज वाढवून घेण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दुसरीकडे एबीपी माझा मध्ये अँकरची जागा खाली होताच रेश्मा साळुंखे जागी सामची अँकर वृषाली यादव हिचा नंबर लागला आहे. तिने  सामला राम राम म्हणत एबीपी माझा जॉईन केले  आहे. दरम्यान  वृषाली यादव साम सोडताच तिच्या जागी रचना बोऱ्हाडे ( जुने आडनाव विचारे ) हिने साममध्ये घरवापसी केली आहे.
एक अँकर सोडताच कसा बदल होतो, हे त्याचे उत्तम उदाहरण. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि तो झालाच पाहिजे, पण नव्या अँकरला संधी कधी मिळणार ? हा प्रश्नच आहे.