आशिष जाधव झी २४ तास मध्ये रुजू

मुंबई - प्रसाद काथे यांचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आल्यानंतर झी २४ तासचे कार्यकारी संपादक म्हणून आशिष जाधव रुजू झाले आहेत. त्यामुळे राहा एक पाऊल पूढे मध्ये नवा गडी नवा राज सुरु झाला आहे.

आर्थिक  संकटात सापडलेल्या झी २४ तास मधून सध्या अनेकांना नारळ देण्यात येत आहे. कार्यकारी संपादक असलेल्या प्रसाद काथे यांचाही तडकाफडकी राजीनामा घेण्यात आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांना अचानक नारळ का देण्यात आला ? याची उलटसुलट चर्चा सुरु आहे.

जाधव आयबीएन लोकमत,  महाराष्ट्र १ असा प्रवास करीत जय महाराष्ट्र मध्ये राजकीय संपादक म्हणून काम पाहत होते. त्यांनी जय महाराष्ट्रला जय महाराष्ट्र करीत एक पाऊल पुढे टाकले आहे.