मोरू परतुनी आला...

संघ कृपेंकरुन निवृत्तीच्या वयात मराठवाड्यातुन  थेट त्रिपुरात गेलेला मोरू अखेर बदनाम होऊन परतला.तो सन्मानाने परतला असता तर किती चांगले झाले असते.म्हणजे महाराष्ट्राची -मराठवाड्याची इभ्रत राहिली असती.कदाचित कुलगुरू पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मोरूला एखाद्या राज्याचा राज्यपाल किंवा गेला बाजार कुठे तरी सल्लागार म्हणून तरी बसवले असते.पण विनाश काले विपरीत बुद्धी म्हणतात तसे झाले.

धारूरकर यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील रघुनाथ मुखर्जी यांनी म्हटले आहे.म्हणजे तूर्तास राजीनामा देऊन धारूरकर मराठवाड्यात येत असले तरी ससेमिरा काही सुटणार नाही अशी चिन्हे आहेत,हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवणार असे एकंदर दिसते आहे.गुरुजींनी आजवर हात दाखवून अवलक्षण अनेकदा केले,त्यांचा हातगुण सर्वानाच माहिती होता,पण पायगुणही बुडत्या डोहाचा असेल हे माहित नव्हते,पाय डोहात बुडाले तेव्हाच ते कळले.बरे या बुडत्याला तिथे त्रिपुऱ्यात काडीचा आधार घ्यायला काही चान्सही नव्हता,झाला,मग व्हायचा तो अण्णू गोगट्या झाला.जे झाले ते वाईटच.म्हणजे तशी मोरूची या आधीची ओळख काही निरपेक्ष निरासक्त गुरुब्रम्ह म्हणून होती असे नाही.शिष्य मंडळींकडून हक्काने गुदक्षिणा उकळणारे गुर्जी असा त्यांचा दुर्लौकिक आधीपासून होताच.म्हणजे एखादा शिष्य आदरभावाने गुरुजींच्या पाया पडला तर त्याच्या डोक्यातील टोपी काढून घेण्याची शिताफी गुरुजींच्या हातगुणात होती.

१७२ पीएचडी देण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.गुरुजींच्या या पीएचडी अभियानाचे अनेक रंजक मनोरंजक खमंग किस्से सध्या खाजगी चर्चा आणि सोशल मीडियातून चिवडले जात आहेत.खरे तर माणूस तसा निरुपद्रवी,पापभिरू,सशाच्या काळजाचा इत्यादी वगैरे.म्हणजे सकृत दर्शनी तरी तसा वाटायचा,पण गोगलगाय आणि पोटात पाय असं अनेकदा असतं.गोगलगाय दूध देत नाही,पण ही द्यायची. कधी शिंगेही काढत नसे,त्यामुळे त्यांच्या अनधिकृत कुरापतीकडे लोकांनी अंमळ दुर्लक्षच केलं.इथपर्यंत सगळं ठीक ठाक होतं,गुर्जी त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू झाले तेव्हा मराठवाड्यात आणि औरंगाबादेत त्यांच्या फक्त आरत्या उतरवणेच बाकी उरले होते.पण गुर्जी त्रिपुरात गेले आणि गोगलगाईचं रूपांतर नीलगायीत झालं.कुलगुरूंचं पद,त्यामुळे बऱ्यापैकी अमर्याद अधिकार.मोकळं रान ,हिरवंगार गवत,नीलगाय चरायला लागली.चरतच सुटली.रवंथ कराय
 हा अनेकांना प्रश्न पडला आहे.
लाही थांबेना.अखेर गळ्यापर्यंत आलं.म्हणजे संपलंच सगळं.नुसतं प्रिंटिंगच्या सहा लाखाचं झेंगट नाही म्हणे,बरच काही आहे अजून,जवळपास १४-१५ जणांकडून विद्यापीठात कायम प्राध्यापक म्हणून वर्णी लावण्यासाठी गुरुजींनी मोठ्या दक्षिणा घेतल्यात,शिवाय अनेक कामांची,दौरे आणि मीटिंगाची,विमान प्रवास,हॉटेल आदींची बोगस बिले लाटल्याचेही लचांड आहेच.अनेक जण गुरुजींच्या या कलंकित आध्यायला संघाशी जोडताहेत.ते काही बरोबर नाही,संघाने त्यांना आपला माणूस म्हणून मोठी संधी दिली इतकेच,पण तिथे जाऊन हे असे उद्योग करायला थोडेच सांगितले असणार.असो,मोरू आता आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन त्रिपुरातून परतीच्या प्रवासाला निघालाय.त्याचे स्वागत कोणत्या मिषाने करावे ?

-रवींद्र तहकिक
7888030472