दिव्य मराठीला सोलापुरात टीम घेताना नाकी नऊ...

सोलापूर - लवकरच सुरू होणाऱ्या दिव्य मराठीला टीम गोळा करताना नाही नऊ आले आहे....टीमचा कॅप्टन म्हणजे निवासी संपादक मिळविण्यातच दिव्य मराठीचा आतापर्यंतचा वेळ खर्ची गेला...सकाळमध्ये मन व पुढारीत शरीर असलेले अरूण खोरे,ओबामा मित्र संजय आवटे, जळगावकर झालेले सुधीर महाजन, एकेकाळी पुण्यात राहून सोलापुरची सुत्रे हलविणारे हरिश केंची यांनी नकार दिल्याने नाईलाज म्हणून सकाळमधून आलेले संजीव पिंपरकर यांच्या गळ्यात निवासी संपादकपदाची माळ टाकण्यात येत आहे.पिंपरकरची अवस्था आता परफॉर्म नसलेल्या क्रिकेटपटू सारखी झाली आहे,त्यामुळे पिंपरकर निवासी संपादक झाले तर सोलापूरच्या प्रतिस्पर्धी दैनिकांना मोठा आनंदच होईल...
वृत्तसंपादक म्हणून पिंपरकरचे जीवलग मित्र श्रीकांत कात्रे - सातारकर यांना खास अवतन देण्यात आले होते, परंतु माशी कुठे शिंगली काय माहित ? कात्रे अजून सोलापूरात जाईन झालेले नाहीत.सध्या ते ट्रेनिंग घेत असल्याचे समजते.
निवासी संपादक व वृत्तसंपादक हे नाईलाज म्हणून घेण्यात आले आहेत...जे रिपोर्टर भरती करण्यात आले आहेत, ते म्हणावे तितके सक्षम नाहीत...डेक्सवर काम करणारा संपादकीय स्टॉप अजून भरती करण्यात आलेला नाही. सकाळ, लोकमतमधील काही स्टॉप मुलाखतीसाठी आला होता, तो केवळ पुर्वीच्या मालकांना ब्लॅकमेल करण्यासाठी...पगार वाढल्यानंतर ते आहे त्या जागेत थांबले आहेत.
दिव्य मराठीचा येणाऱ्या माणसांवर विश्वास नाही व जे दिव्य मराठीत येणार आहेत,त्यांचा दिव्य मराठीवर विश्वास नाही.कारण येणाऱ्याला घ्यायचे व परफॉर्म नाही दिला सहा महिन्याच्या आत काढून टाकायचे हे दिव्य मराठीचे औरंगाबादी नखरे सोलापूरकरांना माहित झाले आहेत.ज्यांना कुठेच थारा नाही, असेच दिव्य मराठीत भरती होत आहेत...अशा परिस्थितीत दिव्य मराठी सोलापुरात वाचकांची मर्जी कशी सांभाळणार, हे कोडेच आहे...

ताजा कलम 
सकाळमध्ये अनेक वर्षे उपसंपादक म्हणून काम केलेले उस्मानाबादचे आयुब कादरी गेल्या वर्षी दिव्य मराठीत उस्मानाबादचे ब्युरो चिफ म्हणून जॉईन झाले.वर्षे झाले तरी उस्मानाबादला अजून अंक सुरू झालेला नाही. आता त्यांची सोलापूरला बदली करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या