एबीपी माझाचे अमरावतीचे स्ट्रींजर रिपोर्टर शशांक चवरे यांना एका डॉक्टराच्या मारहाण प्रकरणी एबीपी माझाने तडकाफडकी काढून टाकले. त्यानंतर चवरे यांनी आपले म्हणणे बेरक्याकडे कळविले आहे...काय आहे त्यांचे म्हणणे ...
................................................................
पत्रकाराने रुग्णाला केलीली ती मदत योग्य नव्हती का ?
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2awbPQl7TKq2DmbG4boX3jd6JWV44Lbd5Q1mjD2IdrPg9rKH4ykt4wLTNYYDb0KqkgsZim9vZmkl4KuXgQAAJB_RHanbRLSJivrvZ7mCca1Kq98hKsBJSor1GwGLRKxa6RL1zS8dDleQ/s1600/675.jpg)
अमरावती - अपघात
मध्ये जखमी झालेला गजानन कितुकले हा ४५ वर्षीय व्यक्ती हा राजीव गांधी
जीवनदायी योजनेत बसत असताना सुद्धा डॉक्टर सावदेकर यांनी या गरीब(
बिपील ) लाभार्थीला या योजनेत बसविन्यास चक्क नकार दिला ,
रुग्णाच्या पत्नी ने मंगळसूत्र , हातातल्या बांगळया विकून १ लाख २ ० हजार
रुपये खर्च रुग्णावर केले होते मात्र पैसे संपल्याने या रुगानाचे उपचार
डॉक्टर नि थाबविले म्हणून abp माझाचे प्रतिनिधी शशांक चवरे
यांनी रुगाना सोबत कोणतेही संबंध नसताना माणुसकीच्या भावनेतून
डॉक्टरना उपचार करण्यसाठी विनंती करीत होते मात्र डॉक्टरनि राजीव गांधी
योजनेत न बसविता उपचार थांबविले या योजना चा लाभ या लाभार्थीला मिळावा व
रुगणाचे प्राण वाचावे म्हणून शशांक चवरे प्रयत्न्न करीत होते मात्र डॉक्टर
सावदेकर यांनी ५ दिवस पासून रुग्णाचे उपचार थाबविले होते. अखेर काही
पेशंट चे नातेवाईका नि शिव सेना जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्याकडे धाव
घेतली.शिव सैनिकांनी डा .सावदेकर यांना जाब विचारला त्यावेळी माध्यमाचे
अनेक प्रतिनिधी हजर होते,परंतु डा नि उडावाउडवीची उत्तर दिल्याने
शिवसैनिकांनी डा सावदेकर यांना चोप दिला, यावेळी डॉक्टर च्या कक्षात
असललेल्या ABP माझा चे प्रतिनिधी शशांक चवरे सोबत बाचाबाची झाली , अखेर ८
ऑगस्ट ला या पेशंटला जीवनदायी योजनेत बसविण्यत याले मात्र या रुगनाला
योग्य वेळी उपचार न मिळाल्याने ९ ऑगस्ट ला या रुग्णाचा डा नि रात्री
१२.३० वा . मृत्यू (संशयास्पद ) घोषित केला ..या गजानन यांच्या मृत्यूला
डा जबाबदार असल्याची तक्रार गजानन कितुकले यांची पत्नी व भाचा यांनी
फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली …
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgu0nb1VggszQVwBWzP9ZCLy-M92_c2z5r_u3Qo7M6RXS9CuVCXh2bHia5s7glUEqEzt2S2Vp1fFczMdCc2S5WJw07qX88wRYYR1sWc48QWkKlWzlgFVRZMswWLiuaCeFQRE6fHmdt88j8/s1600/1689.jpg)
डॉक्टर ने जर आधीच या रुग्णाला जीवनदायी योजनेत बसविले असते व वेळीच उपचार
केले असते तर रुग्णाचे प्राण वाचले असते .(गजानन यांच्या कुटुंबात
पत्नी ,२ लहान मुले व म्हातारी आई आहे , घरात कमविणारा हा एकटा च होता )
.आज मात्र गजानन कितुकले यांचं कुटुंब निराधार झाले आहे …
abp माझाचे प्रतिनिधी शशांक चवरे चा उद्देश फक्त रुग्णाला योग्य
उपचार मिळवावे व त्याचे प्राण वाचविणे हाच होता पण डा च्या पैसे
कम्विण्याच्या हव्य्साने अखेर एक कुटुंब उघड्यावर आले आहे.यामुळे शहरत डा
.बद्दल चांगलाच रोष व्यक्त होत आहे ….ABP माझा चे प्रतिनिधी शशांक चवरे
यांच्या मुळे शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत डॉक्टर पेशंट व
सरकारला कसे लुबाडतात हे उघडकीस आले …
एखाद्या पत्रकाराने बातमीचा विषय न करता एखाद्या गरीब रुग्णाला मदत करणे आणी अन्याय विरुध्द लढा देणे गुन्हा आहे का ?