औंरगाबादच्या अधिवेशनाने काय साधले ?

मराठी पत्रकार परिषदेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन, औरंगाबादेत दि.२४ आणि २५ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले. यापुर्वीच्या सर्व अधिवेशनाचे रेकॉर्ड या अधिवेशनाने मोडीत काढले.औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने या अधिवेशनाचे उत्तम नियोजन केले होते.याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,विद्यमान अध्यक्ष किरण नाईक,औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सुर्यवंशी,सचिव संजय वरकड,प्रमोद माने व त्यांच्या सर्व सहका-यांचे अभिनंदन...
या अधिवेशनास मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.स्थानिक आमदार आणि खासदारांना निमंत्रण नव्हते.एक निषेध म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते.या अधिवेशनास राज्यभरातून १८०० ते २००० हजार पत्रकार उपस्थित होते.पत्रकारांची एकजूट यानिमित्त दिसून आली.पत्रकारांत एकजूट नसल्यामुळे त्यांचा दबदबा कमी झाला होता.या अधिवेशनाने राजकीय गोटात वेगळा संदेश दिला आहे.आता पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केला किंवा पत्रकारांवर हात उगरला तर सर्व पत्रकार रस्त्यावर येवून,संबंधितांची खुर्ची हालवू शकतात,हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
या अधिवेशनास आय.बी.एन.-लोकमतचे संपादक निखिल वागळे काही अपरिहार्य कारणामुळे आले नाहीत.पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे का,या चर्चासत्रात वागळेंना काही जणांनी अप्रत्यक्ष धुवून काढले.त्याचवेळी लातूरातही एका पत्रकार पुरस्कार कार्यक्रमात चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनीही वागळेंची जाहीर भाषणात चंपी केली.यावेळी वागळेंची एक समर्थक पत्रकार उपस्थित होती.तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
वागळे आता तरी शहाणे व्हा...स्वत:ला ग्रेट समजू नका...तुमच्या चॅनलवर आरडा- ओरड जसे करता,तसे अधिवेशनाला येवून पत्रकारांच्या संरक्षणासाठी आरडा - ओरड केली असती तर हे पत्रकार तुम्हाला डोक्यावर घेतले असते.

पुढे काय ?
पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.तसेच पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे.त्याचा तपशिल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आपण काय करायचे ?
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे. या परिषदेचे अध्यक्षपद भोगलेले पद जाताच,त्यांची मती गुंग झाली आहे.त्यांनी सापासारखी गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे.त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र या.हा बेरक्या तुमच्यासोबत आहे.पाहू या तुम्हाला कोण काय करते ?