बेरक्यावर अभिनंदनाचा वर्षाव...

नागपूरचा श्रमिक पत्रकार संघ हा राज्यात सर्वात श्रीमंत पत्रकार संघ आहे.मात्र या पत्रकार संघात दलालाची टोळी बसली आहे.राजकीय नेत्यांची झेलूगिरी करून,अनेकजण गर्भश्रीमंत झाले आहेत.सर्व सदस्य चार चाकी वाहनांतून फिरतात.मात्र मनाने अत्यंत दळभद्री आहेत.
हा पत्रकार संघ पत्रकारांच्या अडचणी आणि समस्या कधी सोडवत नाही.केवळ चाटूगिरी करतो.रविंद्र दासगुप्तांना मदत तर सोडा पण जे मदत करतात,त्यांच्या वाटेत हे काटे झाले होते.बेरक्याने हे काटे पार उद्ध्वस्त केले आहेत.बेरक्याने त्यांचे काळे धंदे उघडकीस आणण्याचे घोषित केल्यानंतर अनेकांची पातळ झाली आहे.त्यांना जेवण गोड लागत नाही.सगळ्यांची चेहरे पडले आहेत.आता आपले खरे नाही म्हणून तोंड लपवून फिरत आहेत.
नागपूर आणि विदर्भात सध्या फक्त बेरक्याची चर्चा सुरू आहे.नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची बरी मारली म्हणून अनेकजण खूष आहेत.नागपुर आणि विदर्भातील असंख्य पत्रकारांनी आमचे अभिनंदन केले आहे.तसेच अनेकांनी दासगुप्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.