संजीव उन्हाळे यांच्या विरोधात बहिणीची गंभीर तक्रार


औरंगाबाद - महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक श्रीमंत श्रमिक पत्रकार आणि पंचतारांकित सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणारा औरंगाबाद शहरातील संजीव उन्हाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या सख्ख्या बहिणीला ठार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस स्टेशनकडे स्वतः बहिणीनेच केली आहे.
संजीव उन्हाळे यांची सख्खी धाकटी बहिण वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी तेहतीस वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन सुंदर लटपटे या दुसऱ्या पत्रकाराशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.लग्नानंतर तेहतीस वर्षांनी गेल्या १५ सप्टेंबरच्या रात्री माझी सुंदरसोबत संजीवच्याच विषयावरून बोलाचाली झाली. त्या दिवशी सुंदरने मला आईवरून शिव्या दिल्याने मी रागाच्या भरात घरातील आमच्या दोघांच्याही डिप्रेशन आणि झोपेच्या बऱ्याच गोळ्या घेऊन संजूच्या घरी निघून गेले.तिथे रडापडीनंतर संजीव आणि त्याची पत्नी अनघा पाटील यांनी माझ्याकडील गोळ्या हिसकावून घेऊन तू या गोळ्या थोड्या घे,तुला बरे वाटेल असे म्हणत आठ-दहा गोळ्या मला जबरदस्तीने गिळण्यास भाग पाडले.परिणामतः माझी शुद्ध हरवली.माझ्या बेशुद्ध अवस्थेतच मला बीडच्या डॉक्टर भावाकडे त्याच्या दवाखान्यापुढे एका गाडीने आणून पोचवल्याचे मला सकाळी जरा समजले.विशेष म्हणजे एमडी डॉक्टर असणाऱ्या माझ्या डॉक्टर भावानेही मला जबरदस्तीने मला सात-आठ गोळ्या गिळायला लावल्या आणि परत हात धरून बसविले.मी पुन्हा बेशुद्ध झाले.याचीच आवृत्ती लातूर येथे बहिणीच्या घरीही झाली.मधेच जरा शुद्ध आल्यावर मी माझा मोबाईल सुरु केला तर माझा पती सुंदर याचा सेकंदातच फोन आला.या फोन चालू करण्याच्या माझ्या एका कृतीमुळे मला परत येत आले नाहीतर मी गाडीतच मरून पडावे आणि आळ सुंदरवर यावा,काटा दोघांचाही निघावा असा डाव सख्खे भाऊ-बहिण माझ्यासोबत खेळले,असे वृन्दा उन्हाळे यांनी सांगितले. 

( संजीव उन्हाळे  हे दिलासा संस्थेचे सर्वेसर्वा   आणि लोकमत चे  स्तंभ लेखक   आहेत ) 

................................................
वृन्दा  उन्हाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार अशी 
दिनांक – १३/१०/२०१५
प्रती,
आ.पोलीस निरीक्षक,
मुकुंदवाडी पोलीस स्टेशन,
औरंगाबाद
फिर्यादी – वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे 
आरोपी – १] संजीव पंढरीनाथ उन्हाळे,
प्राईड पार्क,वेदांतनगर,औरंगाबाद 
मोबाईल – ९८२२०५९८८३
२] डॉ.अनघा वसंत पाटील,
प्राईड पार्क,वेदांतनगर,औरंगाबाद 
मोबाईल – ९८२२०९७२६४ 
३] डॉ.राजू पंढरीनाथ उन्हाळे,
उन्हाळे हॉस्पिटल,मेन रोड,बीड.
मोबाईल – ९८२२२४४५१३
४]नंदा दिलीप भातलवंडे,
स्टेट बँक ऑफ हैदराबाद कॉलनी,अंबाजोगाई रोड,लातूर
९४२२४६८६९३
५] दिलीप भातलवंडे 
स्टेट बँक ऑफ हैदराबाद कॉलनी,अंबाजोगाई रोड,लातूर
फोन -०२३८२-२२७६०२ 
६] ड्रायव्हर – नाव माहिती नाही 
गाडी स्कारपीओ [बहुतेक]
विषय – तक्रार दाखल करून चौकशी करणेबाबत
आदरणीय महोदय,
मी, वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे,वय ५०, राहणार तिरुपती पार्क,जी बिल्डींग,घर नं.८, सिडको-एन ४ आपल्याकडे माझ्याच कुटुंबियांविषयी तक्रार देऊ इच्छीते. माझ्या पतीचे नाव श्री. सुंदर विलासराव लटपटे असे आहे. पण मी पूर्वीपासूनच माझे माहेरचे नाव लावते. तक्रार करण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. माझा विवाह मी तेहतीस वर्षांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन केला. मी जन्माने ब्राह्मण असून माझे पती जन्माने वंजारी आहेत. आम्हाला मुलबाळ नाही. एक मुलगी झाली होती पण ती जन्मानंतर काही दिवसांनीच वारली.
माझे पती पत्रकार होते, नंतर त्यांनी एकलव्य प्रकाशन नावाचा शालेय मुलांच्यासाठी स्वाध्यायमाला काढली. हा व्यवसाय खूप चालला. मी त्यावेळी बँकेत नोकरी करत होते पण व्यवसायाला मदत करण्यासाठी मी ती नोकरी सोडली. दुर्दैवाने २००५ साली माझे पती आजारी पडले आणि काही लोकांनी अफवा पसरवून आमचा व्यवसाय आता चालू शकणार नाही, या दुखण्यातून ते वाचू शकणार नाहीत असा अपप्रचार केला. हे सर्व पाहून माझे पती जास्तच आजारी पडले आणि डिप्रेशनमध्ये गेले. नंतर आमचा व्यवसाय बुडाला. त्यानंतर माझे पती तीन वर्षे बेडरीडन होते. या गोष्टीला आता दहा वर्षे झाली आहेत आणि हरप्रयत्न करून आम्ही पुन्हा उभे राहण्याची धडपड करत आहोत.
मला मोठा भाऊ संजीव उन्हाळे, डॉ.राजू उन्हाळे आणि नंदा भातलवंडे अशी तीन भावंडे आहेत. यात मी सगळ्यात लहान आहे. माझ्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले. माझी आई ७८ वर्षांची आहे. माझा मोठा भाऊ हाच आमच्या कुटुंबाचा कर्ताधर्ता आहे. 
माझ्या वडिलांच्या निधनानंतर संजीवने बोलण्याबोलण्यात मला सुचवले की मी त्याच्या ‘दिलासा’ या एनजीओ या संस्थेसाठी काम करावे. त्यावेळी माझे पती दैनिक लोकपत्रमध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते. पण व्यवसाय करण्याचे त्यांच्या डोक्यात होतेच. मी दिलासाबद्दल बोलल्यानंतर त्यांनी मला संमती दिली आणि त्यांनी ठरवले की दोन-तीन महिन्यांचा वेळ घेऊन व्यवसाय निश्चित करावा. मग त्यांनी त्यांची नोकरी सोडली. पण त्यांनी नोकरी सोडल्याचे कळताच संजीवने मला त्याच्या संस्थेत घ्यायला नकार दिला. हा खूपच मोठा धक्का होता. आम्ही पुन्हा शून्यावर आलो होतो. मी अनेकदा विनंती केली पण त्याचा नकार कायम राहिला. कंपनीने आम्हाला दिलेले घर सोडून दुसरे घर घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. शेवटी काही मित्रांच्या मदतीने आम्ही नवे भाड्याचे घर घेतले आणि माझ्या पतींनी शैक्षणिक संस्थांना कन्सल्टींग देणे थोड्या प्रमाणात चालू केले. पण आमचा खर्च त्यात भागत नव्हता. व्यवसाय बंद झाल्यापासून सुंदरला डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या सुरु आहेत. मग मजबूर होऊन मी संजीवला मला एखादा छोटे क्लिनिक सुरु करण्यासाठी तुझ्या ओळखीने लोन मिळवून दे, अशी विनंती केली.मधल्या काळात मी घरगुती औषधोपचार आणि मसाज थेरेपीचा तसेच अल्टरनेटिव्ह मेडिसीनचा कोर्स केला होता आणि अभ्यासही केला होता. त्याने होकार दिला पण पुढे काहीच केले नाही. इथे एक गोष्ट सांगणे गरजेचे आहे की संजीव माझा पती सुंदर याचा कायम तिरस्कार करत असे. त्याच्या गैरसमजाला दूर करण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला, सुंदरने काहीच केले नसतानाही त्याची प्रत्यक्ष माफी मागितली पण त्याच्या भावनेत फरक पडला नाही. पुन्हा काही काळानंतर मी एक प्रोजेक्ट त्याच्यासमोर मांडला. हा कॉन्सिलिंगचा व्यवसाय मी एका व्यक्तीसोबत भागीदारीत करणार होते. त्यात मी अडीच लाख रुपये लावणे आवश्यक होते. पण माझ्या भावाने आपल्याला भागीदाराची गरज नाही. मी तुला हा प्रोजेक्ट सुरु करून देतो, असे सांगितले. नंतर काही दिवसांनी मी त्याला विचारले असता मी सध्या मुलीचे लग्न होईपर्यंत कोणतीही गुंतवणूक करणार नाही, असे सांगून विषय संपवून टाकला. मग शैक्षणिक संस्थांना कन्सल्टींग आणि मित्रांकडून उसने पैसे घेऊन आम्ही दिवस काढू लागलो. पण माझा विश्वास होताच की संजीव मला मदत करेलच. मग मी त्याला फोन करायची, कधी तो फोन घ्यायचा, कधी नाही. कधी दोन मिनिटात कॉल करतो असे सांगायचा. मी एवढी डिस्टर्ब असे की मी आधी गुंगीच्या दोन गोळ्या खाऊन मगच त्याला फोन करत असे.मी एकदा त्यला इतकेसुद्धा बोलले होते की यू मेड मी अ बेगर. माझे ना नवऱ्याकडे लक्ष असे ना घराकडे. मग मी दिवसदिवस झोपून राहत असे. पण पैशाचा प्रश्न फक्त पैशानेच सुटतो. मी परत फोन केल्यावर तीन-चार दिवसांनी तो त्याच्या ड्रायव्हरच्या हाती कधी पाच, कधी दहा, कधी पंधरा हजार असे पैसे चार-पाच वेळा पाठवले. दोनदा त्याने मला पन्नास हजाराचे चेक दिले. आमचा दोघांचा फक्त औषधांचा खर्चच दर महिन्याला पंधरा हजाराच्या आसपास जातो हे मी त्याला विनवून सांगत असे. शेवटी परिस्थिती एवढी बिघडत गेली की मी नाईलाजाने उधारी करायला सुरुवात केली. मध्यंतरी संजीवचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले. तेंव्हा तो जरा बरा झाल्यावर मी त्याला उधारीविषयी आणि माझ्यासाठी एखादा जॉब पाहण्याची विनंती केली कारण त्याच्या ओळखी खूप आहेत. मी त्याला विनवले की काहीही करून तुम्ही दोघे भाऊ माझी उधारी फेडा. मग मी जी मिळेल ती नोकरी करेन. माझे पती पण नोकरी करतील आणि आमचा तुम्हाला त्रास होणार नाही. त्यावर त्याने तुला नोकरीची गरज नाही कारण तू माझी बहीण आहेस आणि तुझी उधारी मी आठवडाभरात क्लिअर करतो असे सांगितले. परत काहीच केले नाही. त्याने मधल्या काळात माझ्या वयस्कर आईला ‘वंदा मला सारखी पैसे मागते आणि मला त्याचा त्रास होतो’ असे सांगितले. परिणामी माझे येणेजाणे आईकडे बंद झाले. माझी बाकीची भावंडेही मला त्याला त्रास का देतेस, असे दटावू लागली. मी मग माझ्या पतींना सगळे सांगितले आणि आपण आपली एक एकर शेती विकू असे सुचवले. आधी मी त्यांच्या अपरोक्ष हे सगळे केल्यामुळे ते माझ्यावर चिडले. नंतर त्यांनी संजूला शिव्या दिल्या. मला त्यांनी सांगितले की इथून पुढे तू त्याला कधीही पैसे मागायचे नाहीत. आणि मी एक दिवस त्याला चांगला मारणार आहे. मी यावर घाबरले आणि तू संजीवला हात जरी लावलास तरी मी जीव देईन असे सांगितले. इतक्या वर्षात आमच्यात भांडणे झाली नव्हती पण या कारणावरून आमची चीडचीड होऊ लागली. पुन्हा एकदा माझ्या पतीने संजीवला शिव्या दिल्या आणि तू तुझ्या बहिणीला जो मानसिक त्रास देत आहेस त्याबद्दल मी तुला चांगला मार देणार आहे, असे सांगितले. मला न सांगता त्याने संजीवला काही एसेमेसही पाठवले. शेवटी मी माझ्या पतीला शपथा घालून त्याच्याकडून वचन घेतले की तो संजीवला हातही लावणार नाही. मला आईला भेटावे वाटायचे पण माझी बहीण किंवा भाऊ मला आईकडे अजिबात जायचे नाही, असे रागावून सांगत.
दुसरीकडे आमची परिस्थिती बिकट होऊ लागली आणि माझ्या पतीने जरी मला वचन दिले तरी तो फार डिस्टर्ब झाला आणि त्याच्या डोक्यातला संताप कमी झाला नाही. आमचे नॉर्मल बोलणेही कठीण होऊन बसले. अशातच म्हणजे १५ सप्टेंबरला रात्री सुंदर त्याच्या एका मित्रासोबत घरी दारू पीत आणि पुढे काय मार्ग काढता येईल याची चर्चा करत बसला होता. मध्येच त्याने मला भावाबद्दल शिव्या द्यायला सुरुवात केली मी गप्प बसले. मी विचार केला की सकाळी शांतपणे बोलता येईल. पण अचानक त्याने मला माझ्या आईवरून वाईट शिवी दिली आणि माझा संयम संपला. त्यांना जेवायला वाढून मी रात्री साडेअकरा वाजता मी माझ्या आणि सुंदरच्या डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या, मोबाईल आणि पर्स घेऊन गाऊनवरच घर सोडले. जाताना ते चर्चेत असल्याचे पाहून मी दाराला बाहेरून कडी घातली आणि माझ्या ओळखीच्या एका रिक्षावाल्याला मला भावाकडे नेऊन सोड, असे विनवले. कारण रात्री मला बाहेर भीती वाटत होती. मी भावाला फोन करून मी घर सोडल्याचे सांगितले. तो खूप लांब राहत असल्याने मला पोचायला वेळ लागला. अखेर मी त्याच्याकडे, म्हणजे संजीवकडे पोचले. तो मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि मी सारखी रडत होते. त्यादिवशी मी काहीच खाल्ले नव्हते. एकूणच हे पैसे मागणे सुरु झाल्यावर मला अन्न पहिले की मळमळ होत असे. मी थोडे पाणी मागून माझ्याकडच्या दोन गोळ्या खाल्ल्या.यावर संजीवने विचारले की या कशाच्या गोळ्या आहेत? मी सांगितले की या डिप्रेशन आणि झोपेच्या गोळ्या आहेत.नंतर मी गोळ्यांची पिशवी भावाकडे दिली आणि त्या नीट सांभाळून ठेव,असे सांगितले. त्यानंतर मी कॉफी मागितली.मी सारखी रडत-ओरडत होते की मला सुंदरला फोन करायचा आहे आणि त्याला झापायचे आहे.त्याने माफी मागितलीच पाहिजे.पण माझा फोन आधीच त्यांच्यापैकी कुणीतरी काढून घेऊन बंद केला होता. मी ओरडत होते की माझा फोन तरी दे नाहीतर तुझा तरी दे. मला सुंदरला बोलायचे आहे.यानंतर संजीव आणि अनघा यांनी मला जबरदस्तीने अजून पाच-सहा गोळ्या गिळायला लावल्या. ते म्हणाले की आता तू कसलाही विचार करू नकोस. तुला आता शांत झोप येईल. सात-आठ गोळ्या पोटात गेल्याने मला काही सुचत नव्हते. उठून उभे राहिले तर तोल जात होते. मग त्या दोघांनी मला धरून जिन्यावरून वरच्या खोलीत नेले आणि झोपवले. मी गोळ्यांच्या प्रभावामुळे तुटक तुटक बोलत होते. मला झोपायचे नाही, मला सुंदरला बोलायचे आहे असे म्हणत होते. संजीवने परत मला पाण्यासोबत चार-पाच गोळ्या दिल्या. त्यानंतर मी झोपले असावे किंवा बेशुद्ध झाले असावे. नंतर मला संजूने हलवून, गालावर थापट्या मारून जागे केले आणि सांगितले की बाहेर गाडी आणि ड्रायव्हर तयार आहे. तुला आता बीडला राजूकडे जायचे आहे. मी अजिबात भानावर नव्हते. मी साधे तोंडही धुतले नाही. अनघाने दिलेले कपडे तिच्याच आधाराने घातले आणि कॉफी घेतली. माझे हात इतके थरथरत होते की मला कपही नीट धरता येत नव्हता. मला बीडला आणि तेही रात्री का जायचे आहे हा साधा प्रश्नही मला सुचला नाही. संजीवने मला प्रॉमिस करायला लावले की मी फोन सुरु करणार नाही. अनघाने तिचे दोन ड्रेस घालून एक पिशवी माझ्याकडे दिली आणि दोघांनी मला दोन्ही बाजूंना धरून गाडीत बसवले. माझी गोळ्यांची छोटी पिशवी आधीच त्यांनी पर्समध्ये टाकली होती. गाडीत बसताच मी लगेच कलंडले. वास्तविक माझा डावा हात मोडल्यामुळे त्यात रॉड आहेत आणि झोपताना त्याला जराही धक्का लागला तरी प्रचंड वेदना होतात.पण मला यावेळी काहीच जाणवले नाही.बहुतेक मी अर्धबेशुद्ध असावी किंवा पूर्ण बेशुद्ध असावी. कारण गाढ झोपेतही हाताची वेदना मला जाणवलीच असती. नंतर ड्रायव्हरने मला खूप हाका मारून मारून उठविले आणि सांगितले की राजूदादाचा दवाखाना आला आहे. राजू बाहेरच उभा होता म्हणजे त्या ड्रायव्हरचे संजीव आणि राजूशी सतत बोलणे सुरु असावे. त्याने मला आधार देऊन गाडीतून खाली उतरवले आणि आधार देत त्याच्या दवाखान्यात नेले. माझे डोके अजिबात चालत नव्हते. तो म्हणाला की तुझा बीपी पाहू का? मी नको म्हणून सांगितले. तो म्हणाला की आता आपण नास्टा करू. मी सांगितले की मला खूप मळमळ होत आहे आणि प्लीज मला खायचा आग्रह करू नकोस. त्याने मला घरी न नेता जवळच्या हॉटेलमध्ये नेले आणि काहीतरी मागवले. मला उलटी येत होती पण तिथे इतके लोक खाताना कुठे उलटी करू असा मला प्रश्न पडला.शेवटी मी एक ग्लास घेऊन बाहेर येऊन उलटी केली.पोटात काहीच नसल्याने नुसते कडू पाणी पडले.मग मी राजूला सांगितले की मी काहीच खाणार नाही. फक्त मला कॉफी मागव. नंतर मी माझी गोळ्यांची पिशवी पर्समधून बाहेर काढली. त्याने ती त्याच्याकडे घेतली, गोळ्या पाहिल्या आणि त्यातल्या पाच-सहा गोळ्या मला कॉफीआधी घ्यायला लावल्या. तो म्हणाला की आता तुला बरे वाटेल. तो एमडी म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसीन आहे. मग त्याने मला परत गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला गाडी लातूरला न्यायला सांगितले. मी परत झोपी गेले. पुढे कुठेतरी खूप डोके दुखून मी जागी झाले. कसेतरी उठण्याचा प्रयत्न करत मी ड्रायव्हरला किती वाजले असे विचारले. त्याने काहीही उत्तर दिले नाही. मधेच अचानक थोडी शुद्धीवर आल्यानंतर मी मोबाईल ऑन केला.पण वेळ बघण्याआधीच काही सेकंदातच सुंदरचा फोन आला.तो मला म्हणाला की तू कशी आहेस,कुठे आहेस?मला माफ कर.मी पुन्हा भांडण करणार नाही.संजीवचे नावही घेणार नाही.पण तू कुठे आहेस ते प्लीज सांग. मी ड्रायव्हरला विचारले की आपण कुठे आहोत. यावरही त्याने काहीही उत्तर दिले नाही. मी सुंदरला सांगितले की मी खूप लांब आहे पण नेमकी कुठे आहे हे मला सांगता येत नाही. मी संजीवच्या गाडीत आहे आणि त्याचा ड्रायव्हर माझ्यासोबत आहे. त्यावर तो म्हणाला की तू ड्रायव्हरला विचार आणि मला सांग. तू बीडला आहेस का? मी सांगितले की मी बीडहून निघून खूप वेळ झाला असावा. तो म्हणाला की तुझ्या पाया पडतो, माफी मागतो पण तू बीडला परत ये. मी तुला न्यायला येतो.मी त्याला नको येऊ असे सांगितले कारण एकतर त्याची प्रकृती चांगली नाही आणि वाटेत चुकामूक होण्याची मला भीती वाटत होती. परत मी झोपी गेले. मला ड्रायव्हरचीही भीती वाटू लागली होती कारण तो एकदाही माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नव्हता किंवा साधे मागे वळून पाहत नव्हता. मला नेमके कुठे ते आठवत नाही पण मला पुन्हा जोरदार उलटीची भावना होऊ लागली. तोल जात असल्याने मी गाडीतूनच बाहेर उलटी केली. मी खूप प्रयत्न करून जागी राहिले आणि एक गाव दिसताच ड्रायव्हरला पैसे देऊन पाण्याच्या दोन बाटल्या आणायला सांगितले. योगायोगाने मला रस्त्याच्या उलट बाजूला एक साधा दवाखाना दिसला. मी कशीतरी खाली उतरले आणि कशीतरी तोल सावरत तिकडे निघाले. ड्रायव्हरने मला मदत करण्याचा किंवा सोबत येण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही. सुदैवाने तिथे डॉक्टर होते. मी त्यांना अडखळत सांगितले की मला उलट्या होत आहेत. प्लीज मला उलटी थांबविण्याचे इंजेक्शन द्या. त्यांनी माझे बीपी पाहिले आणि ते म्हणाले की तुमची अवस्था सिरीयस आहे. तुमचे बीपी लो झाले आहे. तुम्हाला इथे राहावे लागेल. मी म्हणाले की मी राहणार नाही. तुम्ही फक्त मला इंजेक्शन द्या. इंजेक्शन्स दिल्यावर डॉक्टरांनी सांगितले की मी तुम्हाला झोपेचेही एक इंजेक्शन दिले आहे पण तुम्ही जाऊ नये असे मला वाटते. मी परत कशीतरी गाडीत बसले आणि ड्रायव्हरला जोरात विचारले की आपण कुठे आहोत? त्याने सांगितले की आपण लातूरजवळ आहोत. तुम्ही झोपी जा. मी त्याला सांगितले की ताबडतोब गाडी मागे फिरवा. मला डायरेक्ट औरंगाबादला जायचे आहे. आधी एवढ्या गोळ्या आणि नंतर तीन इंजेक्शन्स यामुळे मला गरगरत होते. त्याने मला काहीच उत्तर दिले नाही. मी पुन्हा ओरडून त्याला तेच सांगितल्याचे पुसट आठवते कारण नंतर माझी शुद्ध हरपली. माझे डोके कशावर तरी जोरात आदळले पण मी काहीच करू शकत नव्हते. पुन्हा एकदा ड्रायव्हरने जोरजोरात हाका मारून मारून मला जागे केले आणि सांगितले की नंदाताईचे घर आले आहे. माझी बहीण आणि भावजी दारातच उभे होते. मी म्हणाले की मला औरंगाबादला जायचं आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना? पुन्हा काही उत्तर मिळाले नाही. बहिणीने आधार देऊन मला घरात नेले. तू थोडी साबुदाण्याची उसळ खातेस का, असे तिने विचारले. मला उलटीही येत होती, चकराही येत होत्या आणि डोके बधीर झाले आहे असे वाटत होते. मी तिला सांगितले की खाण्याचे नाव काढू नकोस. आधी बाथरूमला घेऊन चल कारण तोल जात आहे. पुन्हा उलट्या सुरु झाल्या. तीन-चार उलट्यांनंतर मी तिला सांगितले की त्या ड्रायव्हरला थांबव कारण मला लगेच परत जायचे आहे. यावर तिने आता आठ-दहा दिवस कुठे जायचे नाही, असे म्हटले. मी म्हणाले की ड्रायव्हर नसला तर मी बसने जाईन. अशीच १०-१५ मिनिटे गेली आणि मी बसल्याजागी झोपी गेले. मला जाग आली तेंव्हा संध्याकाळ झाली होती. मी बहिणीला विचारले की तू मला का उठवले नाहीस? त्यावर तिने सांगितले की संजीवच्या परवानगीशिवाय तू कुठेही जाणार नाहीस. मी मोबाईल मागितला. पण तिने टाळाटाळ केली. मी फार मागे लागल्यानंतर तिने फोन दिला. तिने परत काहीतरी खा असा आग्रह केला पण मी नकार दिला आणि फक्त चहा किंवा कॉफी घेईन असे सांगितले. दरम्यान पुन्हा उलट्या सुरु झाल्या. तिने माझ्या पर्समधून गोळ्या काढल्या आणि एकदम सात-आठ गोळ्या जबरदस्तीने माझ्या तोंडात कोंबल्या.घेतल्या.माझ्या अंगात विरोध करण्याचीही ताकद नव्हती. मी त्याही अवस्थेत ती मला कोंडून ठेवील अशी शंका आल्यामुळे कशीतरी झोकांड्या खात घराबाहेर येऊन बसले आणि मोबाईल सुरु केला. काही सेकंदातच सुंदरचा फोन आला. तो खूप रडत होता. तो म्हणत होता की तू अशी का करते आहेस? दुपारी येते म्हणालीस आणि पुन्हा फोन बंद केलास. मी सांगितले की मी परत झोपले होते आणि बहुतेक नंदाने फोन बंद केला असावा. तो म्हणत होता की तुझी इच्छा नसेल तर तू माझ्यासोबत राहू नकोस. फक्त मला एकदा तुला पाहू दे. नंतर तू म्हणशील तिथे मी तुला स्वतः नेऊन सोडतो. मी सांगितले की मी अजून अर्ध्या तासात निघते आणि साधारण मध्यरात्री तिथे पोचते. मी निघाल्यावर लगेच तुला फोन करीन. पण नाही उचलला तर मी झोपले आहे असे समज. बहिणीच्या गयावया करून मी तिला गाडी आणि ड्रायव्हर आहे का ते विचारले. मी रडत होते, माझे झोक जात होते, मी बोबडे बोलत होते. तिने आधी सांगितले की गाडी परत गेली. मी म्हणाले की ठीक आहे. मी कसे जायचे ते पाहते. यावर तिने आत जाऊन काही फोन केले आणि सांगितले की गाडी आहे आणि ती इथे अर्ध्या तासात येईल.मी म्हणाले की मी त्यापेक्षा जास्त वाट पाहणार नाही.तिकडे सुंदर मरून जाईल. शेवटी साधारण साडेसातला मी निघाले. सुंदरला फोन केला आणि परत झोपी गेले. तसे पाहता लातूर ते औरंगाबाद हा प्रवास मोठा आहे. पण मी फक्त उलटी आली तरच प्रयत्नपूर्वक उठत होते. पुन्हा एकदा ड्रायव्हरने मला हाका मारून मारून उठवले आणि म्हणाला की आपले घर आले आहे. मी बाहेर पहिले तर गाडी संजीवच्या दारात उभी होती. मी म्हणाले की मला माझ्या घरी एन-४ ला जायचे आहे. त्यावर त्याने सांगितले की मला तर इथेच परत आणायला सांगितले होते. मी म्हणाले की एकतर मला माझ्या घरी सोडा नाहीतर मी गाडीतून खाली उतरते. कसे जायचे ते मी बघते. त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते. तो कदाचित घाबरला असावा कारण त्याने गाडी परत फिरवली आणि माझ्या घरापासून बरीच लांब उभी केली. तुमच्या साहेबांनी पाहायला नको, हे स्पष्टीकरणही दिले. नंतर पाच मिनिटांनी मी माझ्या घरी पोचले. प्रत्येक पायरी चढताना मला आता मी पडणार असे वाटत होते. सुंदरने दार उघडले तेंव्हा तो विश्वास नसल्यासारखा माझ्या चेहऱ्याला, हाताला हात लावून पाहात होता. जणू मी जिवंत येण्याची आशा त्याला नसावी.
आदरणीय महोदय/ महोदया, ही कथा- कादंबरीतील गोष्ट नाही. मी केलेला प्रेम-विवाह, सुंदरची वंजारी जात असणे आणि मी कथित ब्राम्हण, आणि म्हणून माझ्या रक्ताच्या नात्यांनीच मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. माझा भाऊ संजीवने आमच्या लग्नानंतर स्वतः आंतरजातीय विवाह केला आणि त्याची बायको माझ्या नवऱ्याच्या जातीची म्हणजे वंजारी, याला काय म्हणावे? मी मुलगी म्हणून वेगळा न्याय? मला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, वरील सर्व आरोपींविरोद्ध झोपेच्या गोळ्या जबरदस्तीने खाऊ घालून, लग्नानंतर ३३ वर्षांनी हा ऑनर-किलिंगचा हा प्रयत्न होता याची दखल घेऊन वरील सर्व आरोपींविरूद्ध कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आणि तक्रार आहे.माझा भाऊ, संजीव हा स्वतःला पुरोगामी विचारांचा पत्रकार समजतो शिवाय तो दिलासा नावाच्या एनजीओचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवतो. अनेक मराठी वृत्तवाहिन्यांवरूनही पुरोगामित्वाच्या चर्चा करतो.माझा भाऊ असला तरी अशा ढोंगी कार्यकर्त्याला अधिक कडक शिक्षा झाली पाहिजे अशी माझी तक्रार आहे.स्वतः पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता आणि मानधनावर काम करणारा पत्रकार आज शहरातील एक श्रीमंत आणि प्रतिष्ठीत व्यक्ती कसा झाला याविषयी मला घेणेदेणे नाही.पण मनात आंतरजातीय लग्नाचा द्वेष ठेवूनच माझ्या खुनाचा प्रयत्न करणारांना शिक्षा झाली तरच समाजात मुलींविषयी भेदाभेद करणार्यांना धडा मिळेल. आणि मला संपवून माझा नवरा सुंदर याला माझ्याच खुनाच्या कटात किंवा आत्महत्या करायला भाग पाडले म्हणून अडकवायचे असा दुहेरी कट होता हे माझ्या लक्षात आले.त्यामुळे माझा नवरा सुंदर याला वरील प्रकारच्या कटात अडकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दलसुद्धा वरील आरोपींविरूद्ध वेगळा गुन्हा दाखल करून या सर्व संबधितांना शिक्षा मिळावी अशी माझी मागणी आणि तक्रार आहे.मी कोणी कायद्याची वकील नाही. तरीही मी तक्रार करण्यास उशीर केला हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. परंतु अंदाजे २५-३० झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्यानंतर मला चार-पाच दिवस सुसंगत विचारही करता येत नव्हता.त्यानंतर मला सर्व घटनाक्रम हळूहळू आठवत गेला.आठवडाभरानंतर मला वारंवार सर्व आरोपींनी [श्री.दिलीप भातलवंडे सोडून] जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गाडीतच माझा मृत्यू व्हावा यासाठी गाडी फिरवत राहिले या सत्याचा मला जबरदस्त मानसिक धक्का बसला.अगदी कालपर्यंत मी मधूनच सर्व काही विसरून जात होते.त्यावेळी मी माझ्या नवऱ्यालाही काही क्षण ओळखत नव्हते. अत्यंत अस्थिर मनःस्थितीमुळे व मानसिक धक्का बसल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यास मला उशीर झाला आहे. त्यातच मी तक्रार दाखल केली तर माझ्या वयोवृद्ध आईला धक्का बसेल या विचारानेही मी तक्रार करावी की नाही या संभ्रमात सापडले होते.पण दुसरीकडे अजूनही आमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे,त्यामुळे शेवटी तक्रार दाखल करण्याचा मी निर्णय घेतला.
आदरणीय महोदय/ महोदया, माझ्याकडून फिर्याद देण्यास उशीर झाला असला तरी आमच्या नवराबायकोच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्हाला संरक्षण द्यावे अशीही मागणी मी या फिर्यादीद्वारे करीत आहे. आमच्यापैकी कोणाला काही अपाय झाल्यास त्याला वरील आरोपी जबाबदार असतील.आम्हाला संरक्षण देऊन आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून शिक्षा करावी हीच माझी मागणी,तक्रार आणि फिर्याद आहे.
 
फिर्यादी,
वृन्दा पंढरीनाथ उन्हाळे 
तिरुपती पार्क,जी बिल्डींग,घर नं.८, सिडको-एन ४,औरंगाबाद, मोबाईल – ९६२३६९५३३९ 
 
सहफिर्यादी,
तिरुपती पार्क,जी बिल्डींग,घर नं.८, सिडको-एन ४,औरंगाबाद, मोबाईल – ९९२२६१४४४१