![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiaMQ2kwRWPW38fCJKXNMK8ABHhzJFRmyUoMCcH6GfFex72yH_EkHqm2DQRfNCj15-e1RHW1vaiaAzr3wutBCx_VLLh4f0DPirH15H-36M8-buMuoCsuX3Yll9KFVOcNmA0yU8ywjZ7Tm4/s320/Mahesh-Motewar.jpg)
गेल्या 2 वर्षापासून पोलीस ज्याचा फरार म्हणून उल्लेख करत
आहेत ते महेश मोतेवार अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या मांडीला मांडी लावून
बसले, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले तरी त्याकाळात गृहखात्याला
मात्र दिसले नाहीत. तसेच ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगणार्या आणि काळा पैसा
भारतात आणू व प्रत्येक भारतीयांच्या खात्यामध्ये कमीत कमी 15 लाख जमा
करण्याची दिवा स्वप्न दाखविणार्या मोदी सरकारचेच राज्यामध्ये सरकार असूनही
या देशातील कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या घामाचा पैसा समृद्धी जीवन
योजनेमध्ये गुंतविणार्या महेश मोतेवार यांच्यावर काही ठोस पावले उचलेली
दिसत नाहीत.
‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांना 420 फसवणुकीच्या
गुन्ह्यात महेश मोतेवार उठझउ 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आले आहे. महेश
मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडले नाहीत.
मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात आहे 420 , 448 , 427
, 491 34 कलम अंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमिष दाखवून 35 लाख
रूपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद
करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना
मोतेवारला फरारी घोषीत केले आहे. मात्र, महेश मोतेवारला फसवणुकीच्या
गुह्यात अजून पोलिस अटक करू शकले नाहीत.
काय आहे प्रकरण?
शिवचंद्र रेवते आणि सांगलीचे तात्यासाहेब शिवगौंडा यांच्या
भागीदारीत येनेगूर येथे रेवते एग्रो कंपनी होती. त्यात पुढे या भागीदारीत
फूट पडली. त्यामुळे कंपनी वादात अडकली, अशा वादात रेवते यांनी तात्यासाहेब
शिवगौंडा यांना फसवणूक करत सदर कंपनी महेश मोतेवार यांना 85 लाखात विक्री
केली. त्यामुळे शिवगौंडा यांनी रेवते यांच्यासह मोतेवार विरोधात उमरगा
न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 30 फेब्रुवारी 2010 रोजी गुन्हा नोंदवला
गेला, यात महेश मोतेवार हे सह आरोपी आहेत. मात्र, या प्रकरणात महेश
मोतेवार हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोतेवारांना घोषित केले आहे.
................
महेश मोतेवार विरोधात मध्यप्रदेशमध्ये वॉरन्ट काढले आहे. 2000
रु. चे इनाम ठेवले आहे. तरीही त्यांना पासपोर्ट मिळतात. परदेशात ते लोक
भ्रमण करतात. ते मुजोर झाले
आहेत. सेबीच्या सेटने 6 महिन्यांचे 2 वेळा
एक्सटेंशनही दिले आहे.- नरेश जैन, अर्थतज्ज्ञ